शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

...तर राजीनामा देऊन कर्नाटकला जावे; राजन घाटेंचा सरकारवर निशाणा

By पूजा प्रभूगावकर | Published: September 16, 2023 5:58 PM

म्हादई अभयारण्य परिसर व्याघ्र संरक्षित क्षेत्र झालेच पाहिजे

पणजी : सरकारला जर म्हादई, पर्यावरण सांभाळता येत नसेल तर सर्वांनी राजीनामे द्यावे व कर्नाटकला जावे, असा कडक इशारा सेव्ह म्हादई, सेव्ह टायगरचे राजन घाटे यांनी दिला आहे. म्हादई अभयारण्य क्षेत्र हे व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर करावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला आहे. मात्र सरकार केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी व्याघ्र संरक्षित क्षेत्र अधिसूचित करण्यास तयार नाही. लोकप्रतिनिधी चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

घाटे म्हणाले, की म्हादई ही आपली आई असे मुख्यमंत्री म्हणतात. मात्र त्यांना त्यांची खुर्ची जास्त प्रिय आहे. त्यामुळेच म्हादई वाचवण्यासाठी म्हादई अभयारण्य क्षेत्र हे व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यास ते कुठलाही रस दाखवत नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे सुद्धा दुर्लक्ष करीत आहेत. गोव्याला पर्यावरण हानीची भीती असतानाही सरकार गंभीर नाही. वाघांचे अस्तित्व हे जंगलातच असते. सरकारातील मंत्री सनातन धर्मावर बोलतात. मात्र व्याघ्र संरक्षण क्षेत्रावर बोलत नाही. म्हादई अभयारण्य क्षेत्रात ५०च्या आसपास घरे आहेत. परंतु तेथील लोकप्रतिनिधी एक हजारांहून अधिक घरे असल्याचे चुकीचे सांगत असल्याची टीका त्यांनी केली.

टॅग्स :goaगोवाforestजंगलGovernmentसरकार