शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

...तर गोंयकारपण नष्ट होईल: उदय भेंब्रे

By पूजा प्रभूगावकर | Updated: January 16, 2025 09:42 IST

गोवा मुक्तीनंतर 'जनमत कौल' या दिवसालाही तितकेच महत्त्व आहे.

पूजा नाईक - प्रभुगावकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील जमिनी मोठ्या प्रमाणात विकल्या जात असून त्या जमिनी बाहेरचे लोक घेत आहेत. यावर नियंत्रण आणावे लागेल. ओपिनियन पोल किंवा 'जनमत कौल' या विषयाशी तसा त्याचा थेट संबंध नाही. मात्र सरकारने वेळीच ठोस भूमिका घ्यावी अन्यथा 'जमिनी' या विषयावरून गोवा व गोंयकारपण नष्ट होईल, अशी भीती माजी आमदार तथा १९६७ च्या जनमत कौल चळवळीतील नेते उदय भेंब्रे यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली. 

गोवा मुक्तीनंतर 'जनमत कौल' या दिवसालाही तितकेच महत्त्व आहे. जनमत कौल म्हणजे दुसरे स्वातंत्र्यच. आपण जे घटकराज्य भोगत आहोत ते याच दिवसामुळे. मात्र जनमत कौलमुळे जे अधिकार मिळाले आहेत त्यानुसार सरकारचे काम होत नाही, धोरणे चुकत असल्याची खंतही भेंब्रे यांनी व्यक्त केली.

१९६७ साली गोव्यात विधानसभा होती, मंत्रिमंडळही अस्तित्वात होते. मात्र तो संघ प्रदेश असल्याने सर्व अधिकार लेफ्टनंट गर्व्हनरकडे होते. मंत्रिमंडळाने घेतलेला एखादा निर्णय ते नामंजूर करू शकत होते. अशातच गोवा महाराष्ट्रात विलीन करण्यावर जनमत कौल घेण्याचा निर्णय झाला. त्यावेळी गोवा महाराष्ट्रात विलीन न करण्याचा 'कौल' लोकांद्वारे झाला. या जनमत कौलामुळे गोव्याला घटकराज्याचा दर्जाही प्राप्त झाला. संघप्रदेशवरून गोवा हे स्वतंत्र राज्य बनले. जनमत कौलाने गोव्याला स्वतःची ओळख, अस्मिता राखण्याचे अधिकार दिल्याचे भेंब्रे यांनी नमूद केले.

...शक्य नाही 

आर्थिक, शैक्षणिक मागासलेल्या राज्यांना विशेष राज्याचा दर्जा दिला जातो. मात्र गोवा तसा नाही. आर्थिक, शैक्षणिक तसेच अन्य क्षेत्रात गोव्याची प्रगती चांगली आहे. दरडोई उत्पन्न तसेच अन्य निकषांच्या आकडेवारीवर आधारित कुठल्या राज्यांना विशेष दर्जा द्यावा हे ठरवले जाते. त्यामुळे गोव्याला विशेष दर्जा शक्य नाही.

गोव्यात पुरेशा संधी नसल्याने डिग्री घेणारे गोमंतकीय तरुण, तरुणी नोकरीसाठी बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई येथे जात आहेत. त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण होत असल्याने परप्रांतीय लोक गोव्यात येत आहेत. त्यामुळे गोव्यात सरकारने पुरेशा संधी निर्माण केल्यास गोमंतकीयांनाच ही पोकळी भरून काढता येईल. उदय भेंब्रे, जनमत कौल चळवळीतील एक नेते.

टॅग्स :goaगोवा