शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

भाजपला ताकही फुंकून प्यावे लागणार; विरोधकांची 'ती' मते नक्की कुणाच्या पथ्यावर पडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2024 10:13 AM

...असा आहे मतांच्या इतिहास, विरोधकांचीही कसोटी

अजय बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क: विधानसभा निवडणुकीत गत शिरोड्यात भाजपपेक्षा काँग्रेस, आम आदमी, आरजी यांना मिळून मिळालेली मते जास्त होतात. भाजप व विरोधी पक्षांच्या मतांमध्ये खूप मोठी तफावत आहे. विधानसभेवेळी विरोधी पक्षांना मिळालेली ही मते लोकसभा निवडणुकीला नक्की कोणाला मिळतील, हे पाहणे उत्कंठावर्धक आहे. 

विरोधी पक्षाची मतेसुद्धा भाजप आपल्याकडे वळवू शकला तरच इथे भाजपला मोठी आघाडी मिळू शकते. मात्र, विधानसभेची पुनरावृत्ती झाल्यास कधी नव्हे तो भाजप येथे पिछाडीवर पडू शकतो. अशावेळी भाजपला येथे ताकसुद्धा फुंकून प्यावे लागेल. नरेंद्र सावईकर हे उमेदवार असते तर गोष्ट वेगळी होती. 

भाजपमध्ये मुळातच येथे केडर मधले व सुभाष शिरोडकर यांचे कार्यकर्ते मिळून आज इथला भाजप निर्माण झालेला आहे. केडरमधल्या काही कार्यकर्त्यांची धुसफूस ही विधानसभेच्या वेळी आढळून आली होती. दोन्ही गटांचे शंभर टक्के मनोमिलन शक्य तेवढ्या लवकर होणे गरजेचे आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत इथे भाजपला ८३०७, दुसऱ्या स्थानावर असलेल्या आम आदमी पक्षाला ६१३३, आरजी पक्षाला ५०६३, मगो पक्षाला २३९७ व काँग्रेस पक्षाला फक्त १९५३ एवढी मते मिळाली होती.

सुभाष शिरोडकर यांनी या मतदारसंघात नेहमी दहा हजारांचा पल्ला सहज गाठला होता. मात्र, पहिल्यांदाच त्यांना आठ हजार अधिक मतांवर समाधान मानावे लागले. याचे मुख्य कारण म्हणजे आरजी पक्षाने या मतदारसंघात जोरदार मुसंडी मारली होती. खास करून जिथे ख्रिश्चन लोकांची संख्या जास्त आहे तेथे आरजीला भरभरून मते मिळाली होती. त्याचाच परिणाम सुभाष शिरोडकर यांची मतसंख्या कमी होण्यावर झाला. यावेळचासुद्धा कल पाहता अल्पसंख्याकांची मते ही आरजीच्याच पारड्यात पडण्याची जास्त शक्यता आहे. कारण विधानसभेचे पराभूत उमेदवार शैलेश नाईक यांनी निवडून आल्यानंतर लोकांशी जो संपर्क होता तो सुरू ठेवला.

मगो पक्षाला इथे २३९७ मते मिळाली होती. पोटनिवडणुकीत बारा हजार मते मिळवणाऱ्या मगोला नंतरच्या निवडणुकीत एवढी कमी मते का मिळाली, हा संशोधनाचा विषय असू शकतो. सर्वांत महत्त्वाची भूमिका येथे असेल ती म्हणजे माजी मंत्री महादेव नाईक यांची. गत विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या तिकिटावर लढताना त्यांनी तब्बल ६१३३ मते घेतली होती. प्रत्यक्षात तसे पाहायला गेल्यास इथे आम आदमी पक्षाचे पूर्वीही काम नव्हते. आजही तसे काम काहीच नाही. त्यामुळे ही जी भरभक्कम मते मिळाली होती ती आम आदमी पक्षाची म्हणण्यापेक्षा महादेव नाईक यांचीच होती.

लोकसभा निवडणुकीत महादेव नाईक कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. वावड्या उठत आहेत की महादेव नाईक हे भाजपमध्ये येतील.

...तर आरजीला फायदा

समजा, भाजपमध्ये ते आले तर ही मते ते भाजपकडे वळवतील. भाजपची व महादेव नाईक यांच्या माध्यमातून आम आदमी पक्षाला मिळालेली मते मिळून येथे भाजपला भरभक्कम आघाडी मिळू शकते. आजच्या घडीला आरजी पक्षाची ५००० व काँग्रेसची २००० मते अधिक केली, तर आरजी येथे यावेळी सात हजारांचा पल्ला नक्की गाठेल.

...असा आहे मतांच्या इतिहास

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला येथे ४८% मते मिळाली होती, तर भाजपला ४७ टक्के मते मिळाली होती. यादरम्यान सुभाष शिरोडकर काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे काँग्रेसला भाजपपेक्षा एक टक्का मते जास्त मिळाली. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ३८ टक्के मते मिळाली होती, तर भाजपला ५२ टक्के मते मिळाली होती. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त ३४%, तर भाजपला तब्बल ६० टक्के मते मिळाली होती.

 

टॅग्स :goaगोवाgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाPoliticsराजकारण