शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गोव्यातील मद्यबंदी शिथिल होणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 19:58 IST

मद्यबंदीचे निर्बंध शिथिल करण्यासाठी पर्यटन खात्याचं आयोगाला साकडं 

पणजी : आचारसंहिता काळात रात्री ११ नंतर मद्यबंदीचे निर्बंध शिथिल करुन व्यावसायिकांना मुभा द्यावी, अशी मागणी अखेर पर्यटन खात्याने निवडणूक आयोगाकडे केली आहे. निर्बंधांमुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला आहे. बार आणि रेस्टॉरण्ट मालकांनी या निर्बंधांवर फेरविचार केला जावा अशी विनंती करणारे निवेदन पर्यटन खात्याला सादर केले होते. उन्हाळी सुट्टी सुरू झाली असून देशी पर्यटक गोव्यात येऊ लागले आहेत. गूड फ्रायडेची सुट्टी विकएंडला सलग लागून आल्याने पुढील चार-दिवस पर्यटकांचा प्रचंड ओघ राहणार आहे. त्यानंतर महिनाभर देशी पाहुण्यांची संख्या लक्षणीय असणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत विदेशी पाहुण्यांची संख्या कमी असते. परंतु देशी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. किनाऱ्यांवर तसेच अन्य पर्यटनस्थळांवर गर्दी उसळलेली असते. बार तसेच किनाऱ्यांवरील शॅकमध्ये रात्री ११ नंतर मद्य बंद करण्यात आल्याने व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. आचारसंहिता २३ मे नंतरच संपणार आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. बार आणि रेस्टॉरण्ट मालकांच्या शिष्टमंडळाने चालू आठवड्याच्या प्रारंभीच पर्यटन संचालक संजीव गडकर यांची भेट घेऊन निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली होती. दरम्यान, पर्यटन खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी हा विषय केंद्रीय आयोगाकडे नेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिलेले आहे.  

टॅग्स :goaगोवाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक