शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:अमित शाह, एकनाथ शिंदे, फडणवीसांनी टाटांना वाहिली श्रद्धांजली; अखेरच्या निरोपासाठी भलीमोठी रांग
2
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
3
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
4
कार नको, सायकल वापर... ऐकताच चालत गेले; जर त्याच क्षणी मनावर ताबा ठेवला नसता तर 'रतन टाटा' बनले नसते
5
भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
6
एक लाखाचं बक्षीस… विकत होता भंगार; भारतात परतताच जावेदला दिल्ली विमानतळावर अटक!
7
भयंकर! बायकोला मिळालेल्या योजनेच्या पैशातून नवरा प्यायला दारू अन् उचललं टोकाचं पाऊल
8
"घरातून बाहेर पडताना त्यांनी..."; टाटांची आठवण सांगताना पीयूष गोयल रडू लागले
9
Ratan Tata Death News : "मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा"; रतन टाटांनी केली होती सूचना, पुण्यातील 'त्या' प्लांटमध्ये आजही काम सुरूच
10
Ratan Tata News : 'ही' ठरली रतन टाटांची अखेरची डील, मिळवला होता २३,००० टक्क्यांचा नफा; कोणता होता व्यवहार?
11
Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर 'भारतरत्न' मिळणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर
12
चलो भगवान भक्तीगड! धनंजय मुंडे पहिल्यांदाच बहीण पंकजासोबत सावरगाव घाटला जाणार
13
हरयाणात भाजप दलित नेत्याला उपमुख्यमंत्री करणार का? राजकीय चर्चांना उधाण
14
चिडलेल्या स्थितीत दुकानाबाहेर पायऱ्यांवरच का बसून राहिली IAS अधिकारी टीना डाबी?
15
टाटा, गोदरेज, भाभा! इराण या बड्या हस्तींना मुकला...; पारशी समाज भारतात आलाच नसता तर... 
16
'तुम्हाला भेटायचं राहूनच गेलं..'; रतन टाटांवर धर्मेंद्र यांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट
17
रुबिना दिलैकने केला रॅम्प वॉक, पडता पडता वाचली; नंतर अभिनेत्रीच्या 'त्या' कृतीचं होतंय कौतुक
18
पैसाच पैसा! घरात सर्वत्र नोटांचे बंडल; नवऱ्यानेच केला लाचखोर इंजिनिअर बायकोचा पर्दाफाश
19
"माझा क्रिकेटशी काहीही संबंध नाही"; असं का म्हणाले होते Ratan Tata?
20
PAK vs ENG : WHAT A MATCH! सपाट खेळपट्टीवर पाकिस्तान 'भुईसपाट', इंग्लंडकडून बेक्कार धुलाई

संपादकीय: वाहतुकीचा शिमगा थांबवा, शहरावरील अत्याचार रोखा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 11:52 AM

राजधानी पणजीत केवळ पणजीचेच लोक फिरतात असे नाही.

राजधानी पणजीत केवळ पणजीचेच लोक फिरतात असे नाही. चोवीस तासात काही लाख लोक अन्य भागातूनही पणजीत येऊन जातात. बहुतांश पर्यटकही त्यात असतात. शहरात आज जी वाहतूककोंडी होत आहे, ते गृहखात्याचे आणि पोलिसांच्या वाहतूक विभागाचे अपयश आहे. सरकारलाही त्याविषयी थोडा तरी खेद वाटायला हवा. वाहनचालकांना स्वयंशिस्त नाही, त्यामुळे वाहतूककोंडी होते, असे सरकारी यंत्रणेने नमूद करणे हा पणजीवासीयांचा, वाहनचालकांचा अपमान आहे.

दुपारी सर्व विद्यालये सुटतात, शिवाय सरकारी कार्यालयांतील कर्मचारी, खासगी कार्यालयांचा स्टाफ, असे सगळे आपल्या घरी जेवायला जातात. मात्र, यावेळी कुठेच एकही वाहतूक पोलिस उभा नसतो. वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी सकाळी आणि दुपारीही पोलिस पणजी शहरात नसतात. सायंकाळी तर राजधानीतील वाहतूक व्यवस्था रामभरोसेच असते. पणजीतील रस्त्यांची फोडाफोडी अशा पद्धतीने सुरू आहे की, वाहन कसे चालवावे तेच लोकांना कळत नाही. कंत्राटदारांची माणसेही कुठेच उभी राहून वाहतुकीचे व्यवस्थापन करत नाहीत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री बाबूश मोन्सेरात, वरिष्ठ पोलिस अधिकारी, महापौर व सर्व संबंधितांनी येत्या आठवड्यात एक दिवस दुपारच्यावेळी आपल्या खासगी गाड्या घेऊन पणजीत फिरावे. वाहन स्वतः चालवावे आणि स्वयंशिस्त दाखवावी. ही माहिती गुप्त ठेवावी. वाहतूक पोलिस विभागालाही कल्पना देऊ नये. पणजीत वाहतुकीचा कसा शिमगा सुरू आहे आणि वाहनचालकांचा, नागरिकांचा, दुकानदारांचा जीव कसा गुदमरतोय, हे मुख्यमंत्र्यांसह सर्वांना कळून येईल.

मोन्सेरात यांनी दोनवेळा विधान केले की, पणजीत सुरू असलेल्या रस्ते खोदाईचा व कामांचा सामान्य लोकांना त्रास होत नाही. अवघेच चार- पाच जण तक्रारी करतात; पण सर्वसामान्य नागरिकांची त्यामुळे गैरसोय होत नाही. सत्तेत असताना प्रत्येक राजकीय नेत्याला असेच वाटते. स्वयंपाक गॅस सिलिंडरचा दर वाढला तर सामान्य माणसाला त्रास होत नाही, असे काही केंद्रीय नेत्यांना वाटते. पेट्रोल- डिझेल महागले तर मध्यमवर्गीयांना मोठासा त्रास होत नाही, कारण त्यांचे उत्पन्न आता वाढलेय, असाही दावा काही राजकारणी करतात. मोन्सेरात त्याच धर्तीवर पणजीतील सामान्य माणसाविषयी बोलतात. सिद्धार्थ कुंकळ्ळ्येकर पणजीचे आमदार होते तेव्हा निवडणूक काळात भाजपच्या त्यावेळच्या विरोधकांनी स्मार्ट सिटीच्या विषयावरून मोठा वाद निर्माण केला होता. घोटाळ्याचा आरोप करत त्याच मुद्दयावर निवडणूक लढवली होती. आता पणजीत दमदार म्हणता येतील, असे कुणी राजकीय विरोधक राहिलेले नाहीत. मनोहर पर्रीकर आज विरोधी पक्षनेतेपदी असते तर त्यांनी पणजीतील नागरिकांना नेतृत्व देत आंदोलन केले असते. आजचा भाजप पर्रीकरांचा आंदोलनाचा वारसा विसरल्याने पणजीची दुर्दशा झाली आहे. लोक खड्ड्यात पडले, वाहने कलंडली, लोकांचा जीव वाहतूककोंडीत गुदमरला तरी कुणालाच त्याचे वाईट वाटत नाही. कारण काहीही झाले तरी आपल्याला मते मिळतात, यातच सत्ताधारी समाधानी आहेत. पणजीच्या वाट्याला आलेले भोग डोळे मिटून सहन करण्याचे काम राजधानीतील सज्जन करत आहेत.

स्मार्ट सिटीची कामे करताना नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जाता आले असते. एका भागातील काम अगोदर पूर्ण करून नंतर दुसऱ्या भागात काम करून लोकांना व दुकानदारांना दिलासा देता आला असता. पणजीत जणू काही मायनिंग सुरू असल्याप्रमाणे सगळीकडे धूळच धूळ दिसतेय. घरांमध्ये, दुकानात, छोट्या हॉटेलांत, नाका-तोंडात धूळ जाते. फक्त कसिनो जहाजांमध्ये आणि पर्वरीच्या मंत्रालयातही धूळ नाही. त्यामुळे सरकारला वाटतेय की, सामान्य माणसाला काहीच त्रास होत नाही. जे पदपथ पाच वर्षांपूर्वी बांधले, जे रस्ते पाच वर्षांपूर्वी दुरुस्त केले होते, ते पुन्हा फोडले आहेत. महिनाअखेरीस अनेक कामे पणजीत पूर्ण होतील, असा दावा सरकार करते. मात्र, सद्यस्थिती पाहता काम पूर्ण होईल, असे वाटत नाही. जूनमध्ये पाऊस सुरू झाला की, पणजी खरोखर स्मार्ट झालीय की पणजीचेच रूपांतर महामांडवीत झालेय ते कळून येईल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा