शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गोव्याचा यथार्थ गौरव; डॉ. प्रकाश पर्येकर यांच्या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 13:21 IST

डॉ. प्रकाश पर्येकर यांच्या वर्सल कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. 

मराठी व कोंकणी या गोव्यातील भाषाभगिनी आहेत. पोर्तुगीज काळात दोन्ही भाषांना गोव्यात खडतर स्थितीला सामोरे जावे लागले, साहित्य निर्मिती, भाषा सेवा यावर त्या काळात मर्यादा आल्या होत्या, गोमंतकीयांनी ज्याप्रमाणे आपला धर्म, देव यांचे रक्षण करण्यासाठी पोर्तुगीजांचा त्रास सहन केला, त्याचप्रमाणे आपली भाषा व भारतीय संस्कृती सांभाळून ठेवण्यासाठीही संघर्ष केला. पोर्तुगीज राजवटीत मराठी भाषेची सेवा करण्याच्या कामात महाराष्ट्रानेही गोव्याला मदत केली. भारतीय संस्कृतीशी आपली नाळ बांधून ठेवण्यासाठी, ती भक्कम ठेवण्यासाठी गोमंतकीयांनी मराठीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा आधार घेतला होता. म्हणूनच त्या काळातदेखील अत्यंत प्रतिकूल स्थितीत गोव्यात मराठी प्राथमिक शाळा लोकच सुरू करत होते.

देवनागरी लिपीतून कोकणी साहित्य निर्मिती करणारी पिढी गोव्यात निर्माण झाली, शणै गोंयबाब यांना दैवत मानून गोव्यातील अनेक युवा- युवतींनी कोकणीतूनही गेल्या चाळीस वर्षात विपुल साहित्य निर्मिती केली आहे. गोव्यात कोकणीला दोन ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले, जगातील कुणाही साहित्यप्रेमीचे डोळे दिपून जावेत अशी ही घटना आहे काल डॉ. प्रकाश पर्येकर यांच्या वर्सल कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. 

साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळालेले गोव्यातील सगळेच कोकणी लेखक किंवा कवी दमदार आहेत, असे मुळीच नाही, काहींचा लेखन दर्जा हा कठोर समिक्षेचाही विषय आहे. मात्र प्रकाश पर्येकर या अस्सल व कसदार लेखन करणाऱ्या लेखकाला काल जाहीर झालेला पुरस्कार हा निःसंशयपणे गोव्याचा यथार्थ गौरव आहे. सत्तरी तालुक्यातील दुर्गम भागातील मध्यमवर्गीय कुटुंबातून पर्येकर पुढे आले. उच्च शिक्षण घेतले. निष्ठेने व प्रामाणिकपणे कोकणीतून साहित्यनिर्मितीचा मार्ग पत्करला. त्यांच्या कथासंग्रहाला योग्य टप्यावर साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. हा सत्तरी तालुक्याच्या प्रत्येक भूमिपुत्राचाही गौरव आहे. 

रवींद्र केळेकर, मनोहरराय सरदेसाय, दामोदर मावजो, महाबळेश्वर सैल, पुंडलिक नायक, उदय भेंब्रे, स्व. चंद्रकांत केणी, हेमा नायक, स्व. रमेश वेळुस्कर, एन. शिवदास आदी अनेकांनी कोकणी साहित्य निर्मितीच्या यज्ञात आपापले योगदान दिलेले आहे. यापैकी अनेकजण अजून लिहित आहेत. पर्येकर यांच्यासह डॉ प्रकाश वजरीकर, मुकेश थळी, जयंती नायक, माया खरंगटे, शिला कोळंबकर, परेश न. कामत, राजय पवार, देविदास कदम आदी अनेकांनी साहित्यसेवा चालवली आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने कोकणी भाषेतील पुस्तके प्रसिद्ध होतात, गोवा सरकारने कोकणी व मराठी या दोन्ही भाषांच्या अकादमींना वाळीत टाकल्यासारखी स्थिती आहे. अर्थात राज्यकर्ते केवळ बोलण्यापुरते व प्रसिद्धीपुरतेच साहित्यप्रेम दाखवतात. मात्र गोव्यातील नवयुवक मराठी व कोकणी या दोन्ही भाषांमध्ये लिहीत आहेत. त्यापैकी काहीजण मोठी झेप घेऊ शकतील, अशा दर्जाचे लेखन करतात.

पुंडलिक नायक यांची 'अच्छेव' कादंबरी अजूनही देशाच्या विविध भागांतील लेखकांच्या चर्चेत असते. भाई मावजो यांची 'कार्मेलिन' तर अनेक ठिकाणी वाखाणली, गौरविली जाते. महाबळेश्वर सैल यांच्या लेखनाची पताका सर्वदूर फडकलेली आहे. कोंकणीत केवळ सारस्वतच लिहितात हा एकेकाळचा समज खोटा ठरवत बहुजन समाजातील लेखकांनी कोकणी साहित्य निर्मितीची ध्वजा कधी खांद्यावर घेतली, हे भाषावादात अडकलेल्यांना कळलेदेखील नाही.

मावजो यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराचीही योग्य दखल लोकमतने घेतली होती. पर्येकर यांना काल दिल्लीहून जाहीर झालेला साहित्य अकादमी पुरस्कार हा बहुजनांमधील कष्टकरी हातांचा सत्कार आहे. ज्या पायांनी म्हादयीची परिक्रमा पर्येकर यांनी पूर्ण करत नदी पात्रात पाऊलखुणा उमटविल्या, त्या अमीट खुणांचाही हा तेजस्वी सन्मान आहे. नव्या युवकांना त्यांचे लेखनातील सातत्य व साधना प्रेरणा देईल. पुरस्कार मिळाल्याने लेखकाचा हुरूप वाढतो. मराठीतील निर्मितीसाठी महाराष्ट्रातील कृष्णात खोत यांना (रिंगाण) अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. मराठीत कसदार साहित्यनिर्मितीची गंगा वाहत असतेच. कोंकणीही समृद्ध झाली आहे. खोत व पर्येकर यांचे अभिनंदन.

 

टॅग्स :goaगोवाsahitya akademiसाहित्य अकादमीsahitya akademi awardसाहित्य अकादमी पुरस्कार