शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:रतन टाटांची अंत्ययात्रा ४ वाजता; वरळी येथील स्मशानभूमीत पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
2
काँग्रेसला धक्का! ५ टर्म खासदार राहिलेल्या काँग्रेस नेत्याचा मुलगा मनसेत प्रवेश करणार
3
अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल
4
PAK vs ENG : WHAT A MATCH! सपाट खेळपट्टीवर पाकिस्तान 'भुईसपाट', इंग्लंडकडून बेक्कार धुलाई
5
"केवळ जिवंत असतानाच नव्हे, तर मत्यूनंतरही..."; सचिन तेंडुलकरची टाटांना भावपूर्ण आदरांजली
6
महायुतीत कुरघोडी! शिंदे गटाच्या आमदाराचं थेट छगन भुजबळांना चॅलेंज; समोर या, मग...
7
लाईव्ह शोमध्ये रतन टाटांच्या निधनाची बातमी कळताच दिलजीतच्या 'या' कृतीचं होतंय नेटकऱ्यांकडून कौतुक
8
Kareena Kapoor : "पुरुषांचं वर्चस्व असलेल्या इंडस्ट्रीत टिकून राहणं कठीण"; करीना कपूरने सांगितला अनुभव
9
चाहत्यांच्या गर्दीत सूरज चव्हाणची तब्येत बिघडली; अंकिता म्हणते, 'त्याला सांभाळायची गरज...'
10
रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला केंद्रातून अमित शाह येणार; पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर
11
रतन टाटांच्या निधनानंतर काय आहे आज कंपनीच्या शेअर्सची स्थिती, किती झाली वाढ किंवा घसरण?
12
Ratan Tata : आजारी कर्मचाऱ्याला पाहायला पुण्याच्या घरी गेले होते रतन टाटा; हा किस्सा सांगून जातो त्यांचा मोठेपणा...
13
संजय राऊतांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल; लाडकी बहीणविषयी केलेलं वक्तव्य पडलं महागात
14
कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी विमान उडवायला तयार झाले होते रतन टाटा, नेमकं काय घडलं होतं? पुण्यातला आहे किस्सा
15
निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजी; मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू?
16
Ratan Tata Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले रतन टाटा; दानच ९००० कोटींवर केलेले...
17
अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातून रतन टाटांनी घेतली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पण सिनेमा फ्लॉप ठरला अन्...
18
बापरे! विमान तब्बल ३४००० फूट उंचीवर असतानाच पायलटचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
19
'ताज' बाहेरचे 'ते' कुत्रे आज पुन्हा पोरके झाले...टाटांनी मिळवून दिली होती हक्काची जागा!
20
Congo Fever : राजस्थानमध्ये खतरनाक आजाराची एन्ट्री; कांगो तापाने महिलेचा मृत्यू, सरकारने जारी केला अलर्ट

सर्व भेद मिटले, तर भारत विश्वगुरू बनेल: वामन केंद्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 1:18 PM

सर्व अन्याय संपला पाहिजे, जाती कशाला पाहिजेत?

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : सर्व अन्याय संपला पाहिजे, - जाती कशाला पाहिजेत? भारत जर विश्वगुरू व्हायचा असेल, तर सगळे भेद मिटले पाहिजेत. सगळे मिळून - एका पातळीवर जोपर्यंत समाज येत नाही, तोपर्यंत हे घडणार नाही, असे मत प्रख्यात नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे यांनी व्यक्त केले.

मडगावातील गोमंत विद्या निकेतनच्या विचारवेध व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. आपण अमेरिकन लोकांकडून काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. एकेकाळी गोरे आणि काळे या दोन वर्णांचा संघर्ष तिथे चालू होता आणि काळ्यांना गुलाम म्हणून वागवले जायचे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

संस्कृतीची श्रीमंती

माझ्या नाटकात शेतकरी किंवा शेतीशी संबंधित सगळे विषय येतात. पहाटे चार वाजता येणारे कुरमुरे, सहा वाजता येणारा वासुदेव, त्याच्या पुढे येणारा गोंधळ इथपासून रात्रीचे कीर्तन, भारुडापर्यंत आणि चावडीच्या मागच्या बाजूला चालणारा तमाशा इथपर्यंतचे सगळे हे शेतीप्रधान जीवनातून उभे राहिलेले आहे. या सगळ्या गोष्टींचा लहानपणापासून म्हणजे नकळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत अक्षरश: माझ्यावर वर्षाव झालाय आणि त्या मला फुकट मिळाल्या. त्याच्यासाठी मी काही फारशी मेहनत केलेली नाही. माझ्या सुदैवाने मला लोककलेचे संस्कार फुकटामध्ये मिळाले, ही श्रीमंती मला मिळाली, असे केंद्रे पुढे म्हणाले.

चळवळ, आंदोलनांनी केले माझ्यावर संस्कार

त्या काळात राजकीय चळवळी व आंदोलने चालू होती. त्यांचा फार मोठा संस्कार किंवा परिणाम हा माझ्या व्यक्तिमत्त्वावर आणि माझ्या विचार प्रक्रियेवर आहे, असे त्यांनी सांगितले. त्या काळामध्ये विद्याथ्र्यांच्या समस्येवर आंदोलने चालू होती. आठवीपासून त्यांच्याशी संबंध आला. पुढे शेतकयांच्या समस्यांवर मराठवाडा विकास आंदोलन झाले. त्याच्यामध्ये मी होतो. नंतर एक फार मोठे आंदोलन मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिले गेले पाहिजे म्हणून झाले. विद्यापीठाच्या नामकरणानंतर ती आंदोलने शमली, असे केंद्रे यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा