शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

स्मार्ट सिटीतील पाण्याने भरलेले खड्डे ठरताहेत मृत्यूचे सापळे; महानगरपालिकेचे दुर्लक्ष

By समीर नाईक | Published: July 05, 2024 2:41 PM

यावर्षी मे पर्यंत ९० टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावाही स्मार्ट सिटी प्रशासन करत आहे. परंतु अजूनही पणजीतील अनेक समस्या सुटलेल्या नाही.

पणजी: राजधानी पणजीला देशातील टाॅप स्मार्ट सिटीपैकी एक बनविण्याच्या दृष्टीने महानगरपालिका आणि इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलोपमेंट लिमीटेड यांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. याचाच भाग म्हणून पणजीतील सर्वात जूनी सांडपाणी वाहिनी बदलण्याचे काम गेले सुमारे ३ वर्षे होते. यावर्षी मे पर्यंत ९० टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावाही स्मार्ट सिटी प्रशासन करत आहे. परंतु अजूनही पणजीतील अनेक समस्या सुटलेल्या नाही.

स्मार्ट सिटीचे काम पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात येत असले, तरी नियमीत पाणी, सुरळीत रस्ता यासारख्या मूलभूत सुविधा अजून योग्य प्रकारे लोकांना मिळत नाही. सांडपाणी वाहनीचे काम जवळपास पूर्ण झाले तरी यासाठी करण्यात आलेले खोदकाम पूर्ण झालेले नाही. काही ठिकाणी केवळ मातीचा भर ओतून खोदकाम बुजविण्यात आले. तर अनेक ठिकाणी डांबरीकरण देखील झालेले नाही. आता तर या खोदकामांमुळे बहुतांश रस्ते खचले असून, परीणाम स्वरुप मोठे खड्डे तयार झाले आहेत.

 पाण्याने भरलेले खड्डे ठरताहेत मृत्यूचे सापळे 

पणजीत अनेक ठिकाणी लहान मोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहेत. मळा, मिरामार, सांतिनेझ, १८ जून मार्ग, मार्केट परीसर, आल्तिनो या भागात मोठे खड्डे दिसून येत आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले असते, त्यामुळे चालकांना याचा अंदाज येत नाही. दुचाकीस्वारांसाठी तर हे मृत्यूचे सापळेच बनत आहे. अशावेळी महानगरपालिकेने हे खड्डे बुजविण्यावर भर दिला पाहीजे, पण असे होताना दिसत नाही.