शहरं
Join us  
Trending Stories
1
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
3
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
4
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
5
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
6
‘भाई विरुद्ध ताई’ युद्धात भाजपच अस्तित्वहीन! बेलापूर मतदारसंघात वेगळाच पेचप्रसंग
7
ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज
8
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
9
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
10
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
11
शेकापची मोठी खेळी, सहा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केली नावे
12
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
13
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
14
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
15
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
16
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
17
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
18
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
19
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
20
शिंदेसेनेची पहिली यादी जाहीर, बुलढाणा मधील दोनही विद्यमान आमदारांना मिळाली पुन्हा संधी

राज्यातील धरणांची पाणी पातळी घटतेय! मान्सून लांबल्याने गोमंतकीयांचे वाढणार टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 12:10 PM

पंचवाडी धरणात ७ टक्के तर अंजुणे धरणात ११ टक्के पाणी राहिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: एकीकडे मान्सून लांबणीवर पडण्याचे संकेत मिळत असतानाच दुसरीकडे राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत कमालीची घट होत असल्याने पिण्याच्या पाण्याचे कसे होईल, अशी चिंता व्यक्त होऊ लागली आहे. संपूर्ण दक्षिण गोवा ज्याच्यावर अवलंबून आहे, त्या साळावली धरणात केवळ २५ टक्के पाणी शिल्लक आहे. पंचवाडी धरणात ७ टक्के तर अंजुणे धरणात ११ टक्के पाणी राहिले आहे.

मान्सून लांबल्यास पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जलस्रोत खात्याचे अधिकारी दैनंदिन तत्त्वावर पाण्याची पातळी तपासत आहेत. त्यानुसार आमठाणे धरणात सध्या ५५ टक्के पाणी आहे. चापोली धरणात ४६ टक्के तर गावणे धरणात ४१ टक्के पाणीसाठा आहे. महाराष्ट्र-गोवा सरकारचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिळारी धरणात मात्र ९६ टक्के पाणीसाठा आहे; परंतु तिळारीच्या बाबतीत सर्व काही बेभरवशाचे आहे.

बार्देश तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला तिलारीचे पाणी न मिळाल्यास आमठाणेहून घेतले जाते, तसेच साळ येथून शापोरा नदीतून पंपिंग करून पाणी घेतले जाते. चांदेल प्रकल्पाला पाणी न मिळाल्यास कळणे नदीतून पंपिंग करून घेतले जाते, अशी माहिती जलस्रोत खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. धरणांमधील पाणी कमी दिसत असले तरी कच्चे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला.

पावसाची हुलकावणी

१ यंदा मान्सूनचे आगमन ४ दिवस उशिरा होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. परंतु हा उशीर केवळ ४ दिवस असणार की त्यापेक्षा अधिक असणार या बाबतीतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या या अंदाजानुसार आतापर्यंत मान्सून अंदमान निकोबार बेटांवर धडक द्यायला हवी होती, परंतु अद्याप त्या ठिकाणी मान्सून पोहोचलेला नाही.

 

टॅग्स :goaगोवाRainपाऊस