शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

फोंडा तालुक्याची तहान भागवणाऱ्या दूधसागर नदीची पाणी पातळी घटली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2023 6:33 PM

फोंडा तालुक्याची तहान भागवणाऱ्या दूधसागर नदीची पाणी पातळी घटली आहे. 

अजय बुवा

फोंडा : संपूर्ण तिसवाडी व फोंडा तालुक्याची तहान भागवणाऱ्या दूधसागर नदीच्या पाण्याची पातळी कमालीची खाली आली असून, आठ दिवसाच्या आत13 पैकी तीन बंधारे  सोडण्यात आले आहेत. असे असतानाही पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटत चालली आहे. पाण्याची पातळी वाढली नाही तर संपूर्ण फोंडा तालुक्या बरोबरच तिसवाडी तालुक्याला पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू शकते.

आमच्या प्रतिनिधीने ओपा येथील पाणी प्रक्रिया प्रकल्पाला भेट देऊन नदीची पाहणी केली असता  मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याची पातळी बरीच खाली आढळून आली. गेल्या दहा दिवसापासून कुळे परिसरातील दोन बंधारे खुले करण्यात आले होते. गुरुवारी आणखीन एक बंधारा खुला करण्यात आला आहे. पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी जलस्त्रोत तसेच बांधकाम खात्याचे अभियंते कसोशीने प्रयत्न करत आहेत. 

ओपा पाणी प्रक्रिया प्रकल्पा मध्ये चार मीटर पाणी असणे गरजेचे असते. सध्या या पाण्याची पातळी 2. 70 मीटर असून पाहण्या पाण्याची पातळी 2.40 मीटर पर्यंत आल्यानंतर फोंडा व तिसवाडी तालुक्यात मर्यादित पाणीपुरवठा केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी 2020 साली ओपा प्रकल्पाला पाण्याची अशीच समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी जलस्त्रोत खात्यातर्फे धारबांदोडा तालुक्यातील विविध खाणीचे पाणी दूधसागर नदीत सोडण्यात आले होते. जेणेकरून दूधसागर नदीची पातळी राखली जाईल. त्यावेळी सदर प्रयोग यशस्वी ठरला होता  यावेळी सुद्धा पाण्याची पातळी राखण्याकरता व दोन्ही महत्त्वाच्या तालुक्याला सुरळीत पाणीपुरवठा करण्याकरता खनिज खंदकातील पाणी पुन्हा एकदा दूधसागर नदीत सोडण्याची प्रक्रिया त्वरित हाती घ्यावी लागेल. या संदर्भात जलस्त्रोत खात्याचे अभियंते सुद्धा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली आहे. अभियंताची प्रतिक्रिया:-दूधसागर नदीच्या पाण्याचे पातळी कमी होत आहे ही वस्तुस्थिती आहे. जलस्त्रोत खात्याने कुळे परिसरातील बंधारे सुद्धा खुले केले आहेत .पाण्याची पातळी अशीच जर खाली येत राहिल्यास  लोकांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. यंदा पाऊस सुद्धा तुलनेने तसा कमीच पडला आहे. नागरिकांनी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी. जयंत प्रभू, सहाय्यक अभियंता 

ओपा पाणी प्रक्रिया प्रकल्प, पाणी नेमके जाते कुठे फोंड्यात नदी,ओहोळ, नाल्यांची काही कमी नाही. धारबांदोडा तालुक्यात  नदीवर लहान एम एल डी चे पाणी प्रक्रिया प्रकल्प राबवून पाणीपुरवठा होत आहे. तीच पद्धत कुठेतरी फोंडा तालुक्यातील नदीवर सुद्धा राबवण्याची वेळ आलेली आहे. मुबलक पाणीसाठा असताना सुद्धा दूधसागर नदीच्या पात्रात मात्र का कमी पाणी मिळते याची शहनशा व्हायला हवी. पूर्वीसारखे सगळे नाले व ओहोळ नदीला मिळाले तर दूधसागर नदीचे पाणी कधीच कमी होणार नाही. परंतु आज काही ठिकाणी नदी व ओहळाचे पाणी अडवण्यात आल्याचे सरास आढळून येत आहे. खांडेपार येथे तर अशी चर्चा आहे की खांडेपार ओहोळाचे पाणी अडवून ते चक्क टँकर मध्ये भरण्यात येत आहे.  ही बाब जर खरी असेल तर पाणी विभागाच्या अभियंतानी तिथे जाऊन त्या संपूर्ण ओव्हाळाची पाहणी करायला हवी. नेमके पाणी कोण अडवतो याची माहिती घ्यायला हवी. ते टँकर कुणाचे हे पण जाणून घ्यायला हवे.

पाऊस लवकर येणे गरजेचेज्या तऱ्हेने  तापमान वाढलेले आहे ते  पाहता त्याचे परिणाम नदीवर सुद्धा होऊ शकतात. नदी आटण्याचे प्रमाण जोर धरू शकते. तेव्हा ठीक ठिकाणी लहानसहान बंधारे घालून पाणी अडवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ओहोळ व नाल्यातले पाणी नदीत सोडण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. किंवा यावर्षी पाऊस लवकर यावा म्हणून देवाकडे याचना करावी लागेल.

 

टॅग्स :goaगोवाriverनदी