शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
2
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
3
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
4
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
5
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
6
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
7
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
8
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
9
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
10
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
11
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
12
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
13
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
14
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
15
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
16
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
17
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
18
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
19
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
20
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक

वायनाड घटनेने सर्वांचे डोळे उघडले! मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2024 8:16 AM

ग्लोबल वॉर्मिंगमुळे निसर्गाचा समतोल बिघडतोय

लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली: आईप्रमाणेच झाडांची काळजी घ्या. वायनाड प्रकरण आमचे डोळे उघडणारे असून ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम जाणवत आहेत. निसर्ग संवर्धन ही काळाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचे विपरीत परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

'एक पेड माँ के नाम' अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी साखळी येथील सरकारी शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले. यावेळी भारतीय जनता पार्टी को-ऑपरेटिव्ह सेलचे अनिल काणेकर, नगरसेवक, शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रत्येक विद्यार्थी, पालकांनी वृक्ष संवर्धन, निसर्गरक्षण, पर्यावरण जागृती यांबाबत विशेष योगदान द्यावे. आज जागतिक पातळीवर निसर्गावर घाला होत असताना निसर्ग जगला तरच सृष्टी सुस्थितीत राहील याचे भान ठेवून सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी मुलांनी झाडे लावली आणि शपथही घेतली.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत