शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

राज्यात खाजन शेती धोरण राबवू; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2024 08:18 IST

राज्यातील खाजन शेतीचा आढावा घेणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : खाजन शेती वाचविण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. खाजन शेतीला पुर्नजिवीत करण्यासाठी आम्ही लवकरच खाजन शेती धोरण राबवू तसेच शेतीला पाठबळ मिळावे, यासाठी खास कृषी विधेयक आणले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली.

अधिवेशनात लक्षवेधी सूचनेदरम्यान खाजन शेती आणि खारफुटींची कत्तल या विषयावर आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील समस्या मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने क्रूझ सिल्वा, कार्ल्स फेरेरा, आलेक्स सिक्वेरा, वेंझी व्हिएगस, अॅन्थनी वास, विजय सरदेसाई व रुदोल्फ फर्नांडिस यांनी समस्या मांडल्या. तसेच कशाप्रकारे खाजन शेती, खारफुटी, बांध नष्ट होत आहेत याची माहितीही दिली.

खाजन शेती हा मोठा विषय आहे. खाजन शेती पुर्नजिवीत करण्यासाठी सर्वात आधी राज्यात किती खाजन शेती आहे, याचा आढावा घ्यावा लागेल. नंतर यावर अभ्यासही करण्यात येणार आहे. पण खाजन शेती वाचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. खाजन शेती हा केवळ कृषीचा विषय नाही. यात महसूल खाते, जलस्रोत खाते यांचाही मोठा सहभाग आहे. त्यामुळे खाजन शेती धोरण तयार करताना कृषीसोबत महसूल व जलस्रोत खात्यांना विश्वासात घेणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

शेती वाचवा

खाजन शेती वाचविण्यासाठी सर्वात आधी खाजन शेती करण्यावर शेतकऱ्यांनी भर देणे आवश्यक आहे. खाजन शेती होत नसल्यानेच येथे खारफुटी वाढते. सध्या सरकार कोट्यवधी रुपये खाजन शेती व इतर गोष्टींसाठी खर्च करत आहे आणि यापूर्वीही खर्च करत आले आहे. शेतजमीनीचे रुपांतर करत आहेत. ही जमीन रुपांतर होऊ नये, असे मलाही वाटते. त्यामुळे खाजन शेती धोरण आल्यावर अनेक गोष्टी नीट होणार आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवनPramod Sawantप्रमोद सावंत