शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

दोन हजार पत्रकार जमतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 10:32 PM

कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघटनेच्या अधिवेशनासाठी मी गेल्या आठवड्यात म्हैसूरला जाऊन आलो. तेथे हजारोंच्या संख्येने पत्रकार जमलेले पाहून मला आश्चर्यच वाटले.

- राजू नायककर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघटनेच्या अधिवेशनासाठी मी गेल्या आठवड्यात म्हैसूरला जाऊन आलो. तेथे हजारोंच्या संख्येने पत्रकार जमलेले पाहून मला आश्चर्यच वाटले.कर्नाटक हे प्रगतीशील राज्य आहे. तेथील वृत्तपत्रसृष्टीही समृद्ध आहे. परंतु, एका अधिवेशनासाठी एवढ्या मोठ्या संख्येने पत्रकार जमणे हा विक्रमच म्हणावा लागेल. देशात अनेक मोठी राज्ये आहेत. त्यांचीही एवढी मोठी अधिवेशने होत नाहीत. कर्नाटकातील अधिवेशनासाठी गोव्यातून मी व श्रीलंका व नेपाळचाही प्रत्येकी एक प्रतिनिधी आला होता.मी माझ्या भाषणात पत्रकारांचा महासंघ बनविण्याची आवश्यकता मांडली. गोव्यासह पश्चिम व दक्षिण राज्यांचे परस्परांशी संबंधित अनेक प्रश्न आहेत, त्यावर नेते खल करतातच; परंतु पत्रकारांनाही भूमिका मांडण्यासाठी परस्पर सौहार्दाने काम करता आले पाहिजे. म्हादईचा प्रश्न आहे. गोवा व कर्नाटकने या बाबतीत अत्यंत टोकाची भूमिका घेतली आहे. कर्नाटकात तर हिंसाचाराची भाषा केली जाते. गोव्यासारख्या चिमुकल्या राज्याने या प्रश्नावरील कायदेशीर बाबींवरच १० कोटींपेक्षा जास्त खर्च केला आहे. वास्तविक दोन्ही राज्यांमधील पत्रकार एकत्र येऊन परिस्थितीचे तटस्थ अवलोकन करू शकतात. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, केरळला ग्रासणारा प्रश्न आहे तो पश्चिम घाटांच्या संवर्धनाचा. केरळमध्ये गेल्या पावसाळ्यात प्रलय येऊन जो हाहा:कार निर्माण झाला त्याला केरळ राज्याने पश्चिम घाटांवर केलेली कुरघोडी कारण झाली. केरळने वारेमाप धरणे बांधली व पश्चिम घाटांना वेसण घालण्याचा जो प्रयत्न केला तो अश्लाघ्य होता, असे आता सांगितले जाते.पत्रकार अभिनिवेशाने आपल्याच राज्याची भूमिका पुढे दामटतात. विस्तृत भूमिका मांडली जात नाही. पर्यावरणाच्या प्रश्नाबाबत तर असा अभिनिवेश योग्य नाही. दुर्दैवाने पत्रकारांना एका व्यासपीठावर आणून त्यांना विषयाची जाणीव करून दिली तरी खूप काही होऊ शकेल.म्हैसूर अधिवेशनात पत्रकारांसाठी आचारसंहिता, वेतनवाढ, पत्रकार भवन आदींची चर्चाही झाली. कर्नाटकाचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी प्रचारी थाटाचे भाषण केले. पत्रकारांची नेतेमंडळी राजकारण्यांचा अनुनय करीत होती, ते खटकले; परंतु राज्याच्या कानाकोपऱ्यातील पत्रकारांची उपस्थिती आणि त्यांचा चर्चेतील सहभाग वैशिष्ट्यपूर्ण आणि दिलासादायक होता. कर्नाटकातील प्रमुख वृत्तपत्रे चार-पाचच आहेत, त्यातही कानडी वृत्तपत्रे अग्रेसर आहेत; परंतु प्रत्येक जिल्ह्यात तीन-चार कानडी वृत्तपत्रे निघतात आणि ती दमदारपणे वाचकांवर गारुड घालून आहेत, हे चित्र निश्चित आम्हा पत्रकारांसाठी अभिमानास्पद होते.

टॅग्स :Mediaमाध्यमेKarnatakकर्नाटक