शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
2
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
3
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
4
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
5
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
6
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
7
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
8
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
9
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
10
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
11
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
12
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
13
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
14
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
15
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
16
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
17
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
18
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
19
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
20
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा

रवी नाईक का राजीनामा देतील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2024 08:26 IST

रवी नाईक आमदारकीचा राजीनामा देतील आणि मग फॉडा मतदारसंघात पोटनिवडणूक होईल, अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती.

सावंत मंत्रिमंडळातील कृषिमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक यांच्या राजीनाम्याविषयी काहीजणांनी अफवा पिकवल्या आहेत. रवी नाईक यांनी वयाची सत्तरी कधीच पार केली आहे. त्यामुळे साहजिकच त्यांच्या कामाच्या कौशल्यावर आणि कार्यक्षमतेच्या प्रभावावर थोड्या मर्यादा आल्या आहेत. वयानुरूप हे घडतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वयाची सत्तरी ओलांडली तरी ते तब्येतीने अगदी ठणठणीत आहेत. उलट वय वाढतेय, तशी पंतप्रधानांची कार्यक्षमता, प्रभावही वाढत चाललाय, गोव्यातील काही मंत्री तरुण असले तरी त्यांना तशी कार्यक्षमता दाखवता येत नाही हा वेगळा विषय. 

रवी नाईक आमदारकीचा राजीनामा देतील आणि मग फॉडा मतदारसंघात पोटनिवडणूक होईल, अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती. ही अफवा आहे की, खरेच रवींच्या मनात वेगळे काही आहे, असा प्रश्न फोंड्यातील काही लोकांना पडला होता, म.गो. पक्षाचे तर विशेष लक्ष होते. मात्र, रवी नाईक यांनी स्वतः बुधवारी जी प्रतिक्रिया दिली त्यावरून संशयाचे धुळे दूर झाले. रवींच्या काही राजकीय विरोधकांनाही त्यातून उत्तर मिळाले असेल. त्यांचाही संभ्रम दूर झाला असेल. 

रवी नाईक यांना एका वृत्तवाहिनीने विचारले, तुम्ही राजीनामा देणार व मग फोंड्यात पोटनिवडणूक होईल, तुमच्या मुलाला तुम्ही रिंगणात उतरवणार ही चर्चा खरी काय? रवी नाईक यांनी दिलेले उत्तर महत्त्वाचे आहे. आपण चर्चा ऐकलेली नाही. कुणाला तरी स्वप्न पडत असेल आपण पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करीन, आपल्याला लोकांनी पाच वर्षांसाठी निवडले आहे. रवी नाईक यांचे हे उत्तर ऐकल्यानंतर भाजपमधीलही काही असंतुष्टांना पुढची दिशा कळून आली असेल. फोंड्यातून भाजपच्या तिकिटावर डोळा ठेवून केवळ भाजपबाहेरील इच्छुकच थांबलेले नाहीत, तर भाजपमधील काही इच्छुकदेखील थांबलेले आहेत. रवी नाईक यांचा फोंड्यातील प्रभाव कमी करून तिथे आपला झेंडा रोवण्यासाठी भाजपमधीलच काहीजण इच्छुक आहेत. अर्थात राजकारण हे असेच चालते. जे वरवर दिसते तसे ते कधी असत नाही. रवी मुरब्बी, धूर्त, अत्यंत अनुभवी व कसलेले राजकारणी आहेत. त्यांना मंगो व भाजपमध्ये काय चाललेय याची पूर्ण कल्पना आहेच. रवी नाईक फोंड्यात पराभूत झाले, तेव्हा लवू मामलेदार जिंकले होते. २०१२ साली भाजपची लाट आली होती. मगो-भाजप युती होती. 

मनोहर पर्रीकर व सुदिन ढवळीकर यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे रवी पराभूत झाले होते, त्यावेळी खरे म्हणजे रवी नाईक गृहमंत्री होते. मात्र, पराभव वाट्याला आला तरी, त्यांनी काम सुरूच ठेवले. आज लवू मामलेदार यांचे राजकीय अस्तित्व राहिले नाही; पण रवींचा प्रभाव कायम आहे. रवींनंतर मुलगा रितेश फोंड्यातून निवडून येऊ शकेल का, हा लाखमोलाचा प्रश्न आहे. दिगंबर कामत यांनी राजीनामा दिला, तर त्यांचा मुलगा मडगावमध्ये पोटनिवडणुकीत जिंकू शकतो का, असादेखील प्रश्न विचारता येतो. रवी नाईक कायम सतर्क व दक्ष असतात. रितेश नगराध्यक्ष होऊ नये, म्हणूनही पूर्वी काहीजणांनी डाव खेळला होता; पण तो डाव रवींनीच यशस्वी होऊ दिला नाही. रामभक्तीच्या विषयावरून उत्तर भारतात भाजपला अनुकूल वातावरण तयार झाले आहे. 

गोव्यातही अनुकूलता आहे. त्यामुळे रवींनी समजा आमदारकी सोडून मुलाला रिंगणात उतरवले तर काहीही घडू शकते. मात्र, आपण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करीन, असे जाहीर केल्याने आता चर्चा करण्यात अर्थ नाही. मतदार आपला लोकप्रतिनिधी पाच वर्षासाठी निवडतात. काहीजण मध्येच पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातात. त्यावेळी मतदारांचा विश्वासघात होतो. रवी २०२२ च्या निवडणुकीत भाजपच्याच तिकिटावर निवडून आले आहेत. फोंडा मतदारसंघात मुस्लीम मतदार मोठ्या संख्येने आहेत. तरीही रवींमुळे भाजपला मते मिळाली. रवी तसे काठावर पास झाले. शेवटी जो जीता वही सिकंदर. रवींनी स्वतःची पाच वर्षाची टर्म पूर्ण करायलाच हवी. रवी दुसऱ्यांदा भाजपमध्ये गेले. आता ते भाजपमध्येच रिटायर होतील. २००० साली मनोहर पर्रीकर प्रथम सीएम झाले, त्यालाही रवी यांचेच पक्षांतर कारण होते. रवी व इतरांमुळे पर्रीकर प्रथम मुख्यमंत्री झाले होते. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण