शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बेकायदेशीर बीफ विक्रीला प्रोत्साहन देणार काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 22:30 IST

गोव्यात बेकायदेशीर बीफ विक्रीला बंदी आहे आणि या कायद्याचे पालन करणे ही सरकारची जबाबदारी आहे. बेकायदेशीरपणे बीफ वाहतूक करू देणार नसल्याचा इशारा समितीने केला आहे.

पणजी: गोव्यात बेकायदेशीर बीफ विक्रीला बंदी आहे आणि या कायद्याचे पालन करणे ही सरकारची जबाबदारी आहे. बेकायदेशीरपणे बीफ वाहतूक करू देणार नसल्याचा इशारा समितीने केला आहे. समितीचे निमंत्रक हनुमंत परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की सर्व नियमांचा भंग करून गोव्यात मोठ्या प्रमाणावर होत असलेली बीफची बेकायदेशीर वाहतूक बंद पडली म्हणून गळा काढणारे हे बेकायदेशीर व्यवहारांना प्रोत्साहन देत आहेत.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बीफच्या व्यवहारासंबंधी संपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली असून, त्यांचे पालन करणे सक्तीचे आहे. मांस प्रकल्पापासून विक्रीच्या स्थानापर्यंतची सर्व कायदेशीर आणि कागदोपत्री माहिती असणे आवश्यक आहे. मारल्या जाणा-या जनावरांचे वय, आरोग्य, त्यांची वाहतूक करण्याची पद्धत, त्यासाठी मिळवावे लागणारे विविध परवाने. जनावरांची हत्त्या करण्याची पद्धत आणि नंतर मांस विक्रेत्यापर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया या बद्दल सर्व काही स्पष्ट करण्यात आले आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे न पाळता केलेले व्यवहार बेकायदेशीर ठरत आहेत, असे त्यांनी सांगितले.कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी बेकायदेशीर बीफ व्यवराहाला प्रोत्साहन देण्याऐवजी आपल्या खात्याचे काम पाहावे. लोकांना ४० रुपये एक या दराने नारळ विकत घ्यावे लागत आहेत. ते ५ रुपये या दराने प्रत्येक कुटुंबाला किमान ३० तरी पुरविण्याचे काम त्यांनी केले तर त्याचा लोकांना अधिक फायदा होईल आणि नारळ त्यांचे निवडणूक चिन्ह असल्यामुळे त्यांनाही फायदा होईल असे ते म्हणाले.बेकायदेशीरपणे गोहत्त्या करणा-याला दोन लाख रुपये दंड व्हावा या मताचे असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एकदा बैठकीत बोलताना सांगितले होते. आपल्याच विचारांचे त्यांनी स्मरण करावे म्हणजे निर्णय घेताना गोंधळ उडणार नाही, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.गोमंतकीय मोठ्या प्रमाणावर बीफ खात असल्याचे चित्र राजकारणी करीत आहेत ते चुकीचे असल्याचा दावा परब यांनी केला. गोव्यात मोठ्या प्रमाणावर असलेला हिंदू समाज हा बीफ खात नाहीत. शिवाय अनेक ख्रिस्ती बांधवही बीफ खात नसल्याचे ते म्हणाले. गोव्यात गोरक्षकांवर जीवघेणे हल्ले होतात आणि उलट गोरक्षकांनाच बदनाम करण्याचा घाट सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत अमृत सिंग, शैलेंद्र वेलिंगकर, कमलेश बांदेकर आणि इतर नेते उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवा