शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

महिला आरक्षण ही नव्या युगाची नांदी; भाजप महिला मोर्चाकडून स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 14:36 IST

महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची मागणी ही बऱ्याच वर्षापासूनची प्रलंबित मागणी होती.

पणजी : केंद्र सरकारने संमत केलेले महिला आरक्षण विधेयक म्हणजे नव्या युगाची सुरुवात आहे. यामुळे महिलांना राजकीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळणार आहे असे प्रतिपादन प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या प्रभारी सुलक्षणा सावंत यांनी पत्रकार परिषदेत केले.

महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची मागणी ही बऱ्याच वर्षापासूनची प्रलंबित मागणी होती. केंद्रातील भाजप सरकारने ती मान्य करुन महिलांना त्यांनी सन्मान दिला आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार असे त्या म्हणाल्या. सावंत म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी यांनी घेतलेला महिला आरक्षणाबाबत घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद आहे. मात्र कॉंग्रेस तसेच काही पक्ष त्याला विरोध करीत आहेत. या आरक्षणाद्वारे महिलांना राजकारणात येण्याची संधी मिळणार आहे. लोकसभा निवडणूका जवळ आल्याने हे आरक्षण जाहीर केल्याची टीका विरोधक करीत आहेत. मात्र तसे नसून उलट भारत स्वतंत्र झाल्याच्या ७५ वर्षानंतर आरक्षणाच्या माध्यमातून भाजप सरकारने महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान केला आहे. आरक्षणामुळे महिला सशक्तीकरणाला अधिकच बळकटी मिळाल्याचे सावंत यांनी नमूद केले.

शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो म्हणाल्या, 'महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावे ही अनेक वर्षापासूनची मागणी भाजप सरकारने पूर्ण केली आहे. यामुळे महिलांना राजकारणात येण्यासाठी अधिकच संधी मिळेल. त्यादृष्टीने महिला आरक्षण महत्वाचे आहे. विधानसभेच्या महिला आमदारांची संख्या २०२७ च्या निवडणूकीत १३ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर व अन्यउपस्थित होते.

विजयादेवी राणे यांच्याकडून स्वागत

महिला आरक्षण विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत झाल्याने गोवा बाल भवनच्या माजी अध्यक्षा विजयादेवी राणे यांनी समाधान व्यक्त केले आहे. पंतप्रधानांच्या या ऐतिहासिक निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. अनेक सरकारांच्या अनेक पंतप्रधानांनी हे विधेयक आणण्याचे प्रयत्न केले. परंतु ते अपुरे का पडले, हे अजून मला कळलेले नाही. परंतु केवळ पंतप्रधान मोदी यांनी हे काम करून दाखवले. हा लोकशाहीचा फार मोठा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा देशातील सर्व महिलांचा विजय आहे असे त्यांनी म्हटले आहे.

 

 

टॅग्स :goaगोवाWomen Reservationमहिला आरक्षण