शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

पुढील तीन दिवस राज्यात यलो अलर्ट : वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 14:39 IST

राज्यात एका बाजूने उष्णतेचा पारा ३४.५ अंश पर्यंत जात आहे तर दुसऱ्या बाजूने आता पाऊसही येत आहे. शनिवारी संपूर्ण गाेव्यात गडगडाटसह मुसळधार पाऊस पडल्याने शनिवारी रात्री गारवा तसेच थंडी पडली होती.

नारायण गवस

पणजी: राज्यात शनिवारी अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला हवामान खात्याने आज १२ ते १५ मे पर्यंत पुढील तीन दिवस यलो अलर्ट जारी केला असून गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी  घेण्याचे आवाहनही हवामान  खात्यातर्फे करण्यात आले आहे.

राज्यात एका बाजूने उष्णतेचा पारा ३४.५ अंश पर्यंत जात आहे तर दुसऱ्या बाजूने आता पाऊसही येत आहे. शनिवारी संपूर्ण गाेव्यात गडगडाटसह मुसळधार पाऊस पडल्याने शनिवारी रात्री गारवा तसेच थंडी पडली होती. गेले महिनाभर लाेक या उष्णतेने हैराण झाले होते. त्यांना काही प्रमाणात आता दिलासा मिळाला आहे. आता पुढील तीन दिवस यलो अलर्ट असल्याने जाेरदार पावसाची शक्यता आहे.

फोंड्यात सर्वाधिक जास्त पाऊस

राज्यात गेल्या २४ तासात फोंडा, वाळपई आणि जुने गाेव्यात १.५ इंच पावसाची नाेंद झाली आहे. मार्च १ ते  आतापर्यंत फोंड्यात सर्वाधिक जास्त ४.१२ इंच पावसाची नाेंद झाली आहे. तर पणजीत आतापर्यंत ३.५ इंच पावसाची नाेंद झाली आहे. तर काणकोणात सर्वाधिक कमी म्हणजे फक्त ०.१४  इंच एवढी नोंद झाली आहे. 

तापमान पोहचले ३४.६ अंशावर

राजधानी पणजीत कमाल तापमान ३४.६ अंश सेल्सियस नाेंद करण्यात आले आहे तर किमान तापमान २५.६ अंश नोंद करण्यात आले आहे. तसेच मुरगावात ३३.८ अंश तर किमान २५.७ अंश एवढे तापमान रविवारी नोंद करण्यात आले आहे. मागिल आठवडेपक्षा राज्यातील तापमानात काही प्रमाणात वाढ झाली आहे. वाढती उष्णता तसेच मधोमध पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे  लोकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम जाणवत आहे.