शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
3
शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
4
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
5
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?
7
पुण्याच्या मैदानात Mitchell Santner ची हवा; पहिल्या डावात टीम इंडियानं केल्या फक्त १५६ धावा
8
Reliance Bonus Share : Reliance Industries देतेय एकावर एक शेअर फ्री; गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा
9
“आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंनी स्वतः उभे राहावे किंवा जय शाहांनाच आणावे”: संजय राऊत
10
जळगावमध्ये गेल्या विधानसभेत विरोधात, आता सोबत करताहेत प्रचार
11
Girish Mahajan : "सर्व बंडखोरांची समजूत घालू, जिल्ह्यात एकाही ठिकाणी बंडखोरी होणार नाही"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
13
अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर
14
बापरे! बँकेच्या लॉकरमधून ४० लाखांचे दागिने गायब; फोन येताच महिलेला बसला मोठा धक्का
15
पोलीस कर्मचारी क्रिकेट खेळण्यात व्यस्त, इकडे चौकीतून हातकड्यांसह चोरट्याने काढला पळ
16
"...'तेव्हा' यांनी किती खोके दिले होते, हे मला माहीत आहे"; अमित ठाकरेंचा उद्धव-आदित्यचं नाव न घेता टोला!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
18
जास्वंदीत घाला 'हे' घरगुती खत; येत्या संकष्टीपर्यंत बाप्पासाठी मिळतील परडीभर फुलं!
19
EPFO मध्ये मोठ्या बदलांची तयारी, अधिक बचतीचा मार्ग होणार मोकळा, सरकारचा हेतू काय?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा

अग्निसंकट निवारण्यास धावला सत्तरीतील युवावर्ग; सामाजिक कार्यकर्त्यांसह शिक्षक, डॉक्टर, वकील, कर्मचारी सरसावले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 10:59 AM

सत्तरीतील डोंगराळ भागात आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत.

गणेश शेटकर, लोकमत न्यूज नेटवर्क पणजीः सत्तरीतील डोंगराळ भागात आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत. गेले अनेक दिवस नौदल, अग्निशमन दल, वन खाते तसेच इतर यंत्रणा आग विझविण्याच्या कामात व्यस्थ आहेत. परिसरातील नागरिकही या यंत्रणांना मदत करीत आहेत. सेवाभावी संस्थांच्या कार्यकर्त्यांसमवेत शिक्षक, डॉक्टर, वकील, सरकारी तसेच खासगी आस्थापनात काम करणाऱ्या अनेक युवकांनी आग विझविण्यास मदत केली.

समाज माध्यमे तसेच वैयक्तिक पातळीवर संपर्क साधून अनेक युवक मदतकार्यात सहभागी होण्याचे आवाहन करीत असून याकारिता अनेकांचे सहकार्यही मिळत आहे.

सरकारी यंत्रणा आपले काम करतातच आहेत, सामाजिक बांधिलकी म्हणून नागरिकही आपली जबाबदारी समजून पुढे सरसावत आहेत. मदत कार्यात सहभागी होणाऱ्या नागरिकांना आवश्यक सर्वतोपरी सहकार्य वन खात्यातर्फे मिळत असून साहित्य तसेच अल्पोपहाराची सोय वन खात्याचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत.

सुटीचा दिवस रानात......

सत्तरी तसेत राज्यभरातील इतर भागात अनेक जणांनी रविवारी आठवड्याची सुटी पूर्ण दिवस आग विझविण्यासाठी रानात घालवली. शिक्षक असलेले फेरी सत्तरी येथील गोपीनाथ गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार सैम जलनाय गटातर्फे रविवारी सत्तरीतील दरोडे रानात सुमारे १२ ते १४ हेक्टर परि- सरातील आग विझविण्यात यश मिळविले. तसेच आग उतरत्र पसरू नये याकरिता रीस मारण्यात आली आहे.

वाळपईचे आरएफओ गिरीश बेलूडकर यांच्या नेतृत्वाखाली वन खात्याच्या इतर कर्मचारांसोबत सुमारे तीस जणांची टीम मोहिमेत सहभागी झाली. सत्तरी, डिचोली, पणजी, सांखळी, अस्नोडा, पेडणे, म्हापसा, सर्वण येथील युवक आग विझविण्याच्या मोहिमेत सहभागी झाले.

विवेकानंद पर्यावरण जागृती फौजही सक्रिय

केरी सत्तरी येथील विवेकानंद पर्यावरण जागृती फॉजवे कार्यकर्तेही आग विझवण्याच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत. रविवारी भगवान महावीर अभयारण्य परिसरात लागलेली आग विझविली. या मोहिमेत वेबचे १२. फोडा येथील चरण देसाय यांच्या नेतृत्वाखाली सेव्ह संस्थेच्या १५ जणांची टीम तसेच वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी मिळून सुमारे ६२ जणांची फौज दिवसभर आग विझविण्याच्या कामात व्यस्त होती.

पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या श्रद्धा रांगणेकर यांनीही या मोहिमेत भाग घेऊन महिलांसाठी आदर्श ठरल्या. वेदचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार भगवान महावीर अभ यारण्यात रविवारी २२ किलोमीटरचे पदभ्रमण केले.

या मोहिमेत तीन वेगवेगळ्या तुकड्या करून आग विझविण्याचे काम केले. आगीत मोठ्या प्रमाणात शेकडो वर्षांची झाडे खाक झाली आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा