शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

१० व १२ वीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 4:26 AM

बिरसी फाटा : कोरोना माहामारीमुळे राज्यातील शाळा सुरू होऊ शकल्या नाही. त्यामुळे १० आणि १२ वीचा अभासक्रम अजूनही ...

बिरसी फाटा : कोरोना माहामारीमुळे राज्यातील शाळा सुरू होऊ शकल्या नाही. त्यामुळे १० आणि १२ वीचा अभासक्रम अजूनही अपूर्ण आहे. यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने या दोन्ही परीक्षांचा ५० टक्के अभ्यासक्रम कमी करून त्या आधारित मूल्यमापन पध्दतीने परीक्षा घ्याव्यात. विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण सरसकट द्यावेत आणि प्रात्यक्षिक परीक्षा न घेता त्यासाठी ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने काही लेखी परीक्षा घ्याव्यात. अथवा त्या रद्द कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे गुड्डू बोपचे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षी गायकवाड यांच्याकडे केली.

कोरोनासारखे महाभंयकर संकट महाराष्ट्र व संपूर्ण जगात आले आहे. या संकट काळात शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून मुकावे लागले आहे. इंटरनेटमुळे ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिक्षण मिळू शकले नाही. ग्रामीण भागात अवघा १ महिना शाळा सुरू झाली होती. पण तीसुध्दा कोरोनामुळे बंद झाली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसंदर्भात महत्त्वपूर्ण असलेली १२ व १० वीची परीक्षा अपूर्ण अभ्यास असताना कशी द्यावी, असा प्रश्न सवाल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पडला आहे. शिक्षणमंत्र्यांनी संबंधित बाबीवर गांर्भीयपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी बोपचे यांनी केली आहे.