शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
Bhagyashree Navtake IPS: १२०० कोटींचा घोटाळा, सीबीआयचा गुन्हा; कोण आहेत भाग्यश्री नवटके?
4
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
5
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
6
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
7
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
8
Noel Tata: नोएल टाटांची पत्नी कोण? त्यांना कोणत्या गोष्टींची आहे आवड?
9
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
10
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
11
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
12
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
13
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
15
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
16
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
17
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
18
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
19
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
20
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...

२३१ मुले शाळाबाह्य

By admin | Published: July 08, 2015 1:36 AM

शाळाबाह्य मुलांना हक्काचे शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण विभागाकडून शनिवारी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत सर्वेक्षण करण्यात आले आहे.

सर्वत्र सर्वेक्षण : १६५ मुलांनी पाहिले नाही अजून शाळेचे तोंडगोंदिया : शाळाबाह्य मुलांना हक्काचे शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण विभागाकडून शनिवारी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात जिल्ह्यात २३१ मुले-मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले. त्यांना नियमित शाळेत जाण्यासाठी आता नियोजन केले जाणार आहे.जिल्ह्यातील २ लाख ७९ हजार २८४ कुटुंबातील बालकांचे सर्वेक्षण करण्यासाठी १० हजार ४३४ व्यक्ती सहभागी झाले होते. त्यात शिक्षकांसह इतर विभागांचे कर्मचारी आणि कधीच शाळेत न गेलेल्या तसेच मध्येच शाळा सोडलेल्या बालकांचे व सतत ३० दिवस शाळेत गैरहजर राहणाऱ्या बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्येकाच्या घरी, बाजार, रेल्वेस्थानक, बसस्थानक व शेतात जाऊन हे सर्वेक्षण करायचे होते. मात्र बहुतांश कर्मचाऱ्यांनी फक्त घरोघरी जाऊनच सर्व्हेक्षण केले. शेतात, बाजारात, रेल्वे स्थानक किंवा बस स्थानकात सर्वेक्षण करण्याचा प्रकार क्वचितच काही ठिकाणी घडला.आमगाव तालुक्यात कधीच शाळेत न गेलेली ७४ बालके, मध्येच शाळा सोडलेली ३ बालके असे ७७ बालके शाळाबाह्य आढळली. विशेष म्हणजे अर्जुनी-मोरगाव तालुक्यात एकही मुलगा शाळाबाह्य आढळला नाही. देवरी तालुक्यात कधीच शाळेत न गेलेली १० बालके, मध्येच शाळा सोडलेली ७ बालके असे १७ बालके शाळाबाह्य आढळली. गोंदिया तालुक्यात कधीच शाळेत न गेलेली ४८ बालके, मध्येच शाळा सोडलेली ३२ बालके असे ८० बालके शाळाबाह्य आढळली. गोरेगाव तालुक्यात कधीच शाळेत न गेलेला १ बालक, मध्येच शाळा सोडलेली ३ बालके असे ४ बालके शाळाबाह्य आढळली. सडक-अर्जुनी तालुक्यात कधीच शाळेत न गेलेली ८ बालके, मध्येच शाळा सोडलेली ८ बालके असे १६ बालके शाळाबाह्य आढळली. सालेकसा मध्येच शाळा सोडलेली १ मुलगी शाळाबाह्य आढळली. तिरोडा तालुक्यात कधीच शाळेत न गेलेली २४ बालके, मध्येच शाळा सोडलेली १२ बालके असे ३६ बालके शाळाबाह्य आढळली. गोंदिया जिल्ह्यात कधीच शाळेत न गेलेली १६५ बालके, मध्येच शाळा सोडलेली ६६ बालके असे एकूण २३१ बालके शाळाबाह्य आढळली. या सर्वेक्षणात शाळाबाह्य आढळलेल्या या बालकांचे आधार कार्ड काढून दिले जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)सर्वेक्षणात स्वयंसेवी संस्थांचाही सहभागया सर्वेक्षणाच्या कामात शिक्षक, आंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब, लॉयन्स क्लब, माविमचे अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या अधिनस्थ असलेले कर्मचारी यांनी सहकार्य घेतला.अर्जुनी-मोरगावात खरेच झाले का सर्वेक्षण?अर्जुनी-मोरगाव तालुक्यात शाळाबाह्य मुले नाहीच, असे म्हटले तर ही बाब तेथील सामाजिकतेच्या गौरवाची बाब आहे. येथे कुणीही बालक शिक्षणापासून वंचित नाही. परंतु खरंच या तालुक्यात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण प्रामाणिकपणे झाले का? असा प्रश्न उपस्थित होतो. या तालुक्यात भटकंती करणारे लोक नाहीत का? भिकारी नाही का? शाळा सोडून घरी राहणारे किंवा कधीच शाळेत गेले नाही असा एकही बालक या तालुक्यात आढळला नाही. त्यामुळे या तालुक्यात सर्वेक्षण किती प्रामाणिकपणे झाले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.