शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

रिसामा येथील ३०९ कुटुंबांना मिळणार आखीव पत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:28 AM

आमगाव : आखीव पत्रिकेवर नाव नसल्यामुळे मालकी हक्कापासून वंचित असलेल्या ग्राम रिसामा येथील ३०९ कुटुंबांना आता दिलासा मिळणार ...

आमगाव : आखीव पत्रिकेवर नाव नसल्यामुळे मालकी हक्कापासून वंचित असलेल्या ग्राम रिसामा येथील ३०९ कुटुंबांना आता दिलासा मिळणार आहे. आ. सहषराम कोरोटे यांच्या मध्यस्थीने अपर जमाबंदी आयुक्तांनी या मिळकती समाविष्ट करण्याचा आदेश दिला आहे. अशात आता या ३०९ कुटुंबांना आखीव पत्रिका मिळणार आहेत.

आमगाव तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात जुन्याच सिटी सर्व्हेनुसार तालुक्यातील मिळकती (आखीव पत्रिका) कायम होत्या. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावातील कित्येक प्लॉटधारकांचे नाव आखीव पत्रिकेवर नव्हते. तालुक्यातील मौजा रिसामा येथील कित्येक घरमालकांचे आखीव पत्रिकेवर नाव नसल्याने बांधकाम नकाशा मंजूर करण्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या. स्वतःच्या मालकीचे घर असूनही त्यांची घरावर मालकी नाही. घर विकणेही शक्य नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून न्याय मिळावा, यासाठी या भागातील नागरिकांचा लढा सुरू होता. १९९४ च्या शासन निर्णयानुसार भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करण्यात आली. त्या अनुषंगाने नागपूर विभागातील आमगाव तालुक्यातील मौजा रिसामा गावच्या सुटलेल्या ३०९ मिळकती प्रस्तावित होत्या. ही बाब रिसामा येथील से.नि.शिक्षक श्यामराव बहेकार, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष संजय बहेकार, महिला तालुकाध्यक्ष छबू उके, बाजार समिती उपसभापती रविदत्त अग्रवाल, तालुका सचिव महेश उके, शहर अध्यक्ष अजय खेतान, सरपंच राजकुमार मोदी, रामेश्वर श्यामकुवर, उज्ज्वल ठाकूर यांनी आ. सहेषराम कोरोटे यांच्या लक्षात आणून दिली. प्रकरणी आमदार कोरोटे यांनी अपर जमाबंदी आयुक्त (पुणे) यांच्याकडे पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. अपर जमाबंदी आयुक्तांच्या १५ मार्च २०२१ च्या आदेशानुसार ३०९ मिळकत समाविष्ट करणेबाबत मंजुरी मिळाली. आमदार कोरोटे यांच्या प्रयत्नांनी ३०९ मिळकती कायम करण्यात आल्या असून, लवकरच ३०९ कुटुंबीयांना आखीव पत्रिका वाटप करण्यात येणार आहे.