शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

जागेच्या अधिग्रहणासाठी ३२ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 9:50 PM

शहरातील पूर्व बायपासच्या (पोलीस मुख्यालय कारंजा-जिल्हाधिकारी कार्यालय-बालाघाट रोड) बांधकामात येत असलेली जागेची अडचण आता दूर होणार आहे.

ठळक मुद्देशहरातील पूर्व बायपास : डिसेंबर अखेर होणार मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील पूर्व बायपासच्या (पोलीस मुख्यालय कारंजा-जिल्हाधिकारी कार्यालय-बालाघाट रोड) बांधकामात येत असलेली जागेची अडचण आता दूर होणार आहे. बायपाससाठी जागा अधिग्रहीत करण्यासाठी ३२ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळेच लवकरच जागेचे अधिग्रहण करून बायपासचे उर्वरीत काम पूर्ण केले जाणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत बायपास वाहतुकीसाठी मोकळा होणार असल्याचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी म्हटले आहे.छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यांना लागून असल्याने गोंदिया शहरातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. यात प्रामुख्याने जड वाहनांचा समावेश असून शहरातून ही वाहतूक होत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत होते. शिवाय ट्राफीक जामची समस्या शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत होती.या समस्येवर कायमचा तोडगा निघावा यासाठी बायपास रस्ता तयार करण्यासाठी आमदार अग्रवाल यांचे प्रयत्न सुरू होते. बायपासने वाहतूक सुरू झाल्यास ट्राफीक जाम व अपघातांची समस्या सुटणार ही बाब आमदार अग्रवाल यांनी हेरली होती. यासाठी त्यांनी १० वर्षांपूर्वी जागा अधिग्रहणाची प्रक्रीया सुरू केली होती. तर तत्कालीन कॉंग्रेस सरकारमधील केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री कमलनाथ यांना विनंती करून पूर्वी बायपाससाठी केंद्रीय रस्ते निधीमधून सुमारे ६८ कोटी रूपयांचा निधी मंजूर करवून घेतला होता.यातील सुमारे १५ कोटी रूपयांचा निधी जागा अधिग्रहीत करण्यासाठी वापरण्यात आला. एवढेच नव्हे तर रेल्वे लाईन असल्याने त्यावर उड्डाणपुलाचे बांधकामही करण्यात आले. मात्र या बायपास बांधकामात मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या व त्यांच्यावर मात करीत आता बायपासचे सुमारे ९९ टक्के काम जवळपास पूर्ण झाले आहे.गोरेगाव- आमगाव रस्त्याला जोडणारा बायपास रस्ता उपयोगासाठी मोकळा करण्यात आला आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालय ते बालाघाट रोड पर्यंत महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चुकीमुळे सुमारे २०० मीटर लांब जागा अधिग्रहीत करता आली नाही. परिणामी बायपासचे पूर्ण होऊनही त्याचा उपयोग होत नव्हता.शहरासाठी महत्वपूर्ण बायपास रस्ता असल्याने आमदार अग्रवाल यांनी उर्वरीत जागेच्या अधिग्रहणासाठी आवश्यक प्रस्ताव शासनाला पाठविला होता. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूरी देत जागा अधिग्रहीत करण्यासाठी ३२ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे.निधी मिळाल्याने जागेची अडचण आता दूर होणार असून लवकरच बायपास वाहतुकीसाठी मोकळा होणार आहे.