शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

३९३७ नागरिक आले ‘सेफ झोन’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:53 AM

गोंदिया : देशात कोरोनाला टक्कर देण्यासाठी लसीकरण जोमात असून आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स सोबतच आता ४५ वर्षांपेक्षा जास्त ...

गोंदिया : देशात कोरोनाला टक्कर देण्यासाठी लसीकरण जोमात असून आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स सोबतच आता ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना लस दिली जात आहे. अशात जिल्ह्यत आतापर्यंत २४,९६६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये ३९३७ नागरिकांचा दुसरा डोसही घेऊन झाला आहे. यामुळे आता ते ‘सेफ झोन’मध्ये आले आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

कोरोनाचा उद्रेक पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्यात खळबळ माजली असून कित्येक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन केले जात आहे. मात्र आता कोरोना विरोधात लढण्यासाठी लस आली असून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, लसीकरणाची सुरुवात आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सला प्राधान्य देत करण्यात आली. मात्र आता कोरोनाचा वाढता धोका बघता ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी शहरातील ५ खासगी रुग्णालयातही लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

कोरोनासाठी देण्यात येणारी ही लस अत्यंत प्र‌भावी असल्याचे सांगितले जात असतानाच या लसीचे २ डोस घेणे गरजेचे आहे. २ डाेस घेतल्यानंतर काही दिवसांनी कोरोनाशी लढणाऱ्या एंटीबॉडीज तयार होतात असा तो फॉर्म्युला आहे. अशात जिल्ह्यात आतापर्यंत ३,९३७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी त्यांना दुसरा डोस घ्यायचा असल्याने दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी दिसत आहे. मात्र कोरोना लसीकरण जिल्ह्यात जोमात सुरू असल्याने लवकरच जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणार यात शंका नाही.

-------------------------

आतापर्यंत २४९६६ नागरिकांचे लसीकरण

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून बुधवारपर्यंत २४,९६६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये २१,०२९ नागरिकांचा पहिला डोस झाला असून ३,९३७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. यात, केटीएस व बीजीडब्ल्यू रुग्णालयात ८,०५३, उपजिल्हा रुग्णालयात २,६५१, ग्रामीण रुग्णालयात ११,४९९ तर प्राथमिक आरोग्य केंद्रात २,७६३ नागिकांनी लस घेतली आहे.

--------------------

भीती न बाळगता लस घ्या

नागरिकात कोरोना लसीला घेऊन आजही प्रमाणात शंका निर्माण झालेल्या आहेत. मात्र कोरोनाची लस अत्यंत सुरक्षित व प्रभावी असल्याने नागरिकांनी लस घेणे गरजेचे आहे. कोरोना विरोधात लढण्यासाठी भारताकडे लस हे शस्त्र तयार असून लसीमुळेच कोरोनापासून सुरक्षा करता येणार आहे. करिता नागरिकांनी लसीला घेऊन कसलीही भीती न बाळगता लसीकरण करवून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.