शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

जिल्ह्यातील ४५ हजार शेतकऱ्यांना मिळणार वीज बिल माफ योजनेचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 5:30 PM

अर्थसंकल्पात घोषणा : कृषीपंपधारक शेतकऱ्यांना होणार मदत; ४३४ कोटी रुपयांची थकबाकी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महायुती सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प शुक्रवारी (दि. २८) राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात विविध घोषणा करण्यात आल्या. यात सर्व कृषीपंपधारक शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल पूर्णपणे माफ करण्याची घोषणा केली. याचा लाभ जिल्ह्यातील ४५ हजार ३२६ कृषीपंपधारक शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीवर आधारित असून, धान हे मुख्य पीक आहे. शेतकरी खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात धानाची लागवड करतात. धानाला पाणी भरपूर लागत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतात विहिरी खोदून त्यावर मोटारपंप लावले आहेत. मात्र, मागील दोन-तीन वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक संकटाला तोंड देत असल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांकडे कृषी पंपाचे वीज बिल थकले होते. त्यामुळे थकीत वीज बिल वसूल करण्यासाठी महावितरणकडून तगादा लावला जात होता. यामुळे शेतकरी संकटात आले होते. जिल्ह्यातील ४५ हजार ३२६ शेतकऱ्यांकडे ४३४ कोटी ८३ लाख २१ हजार रुपयांचे वीज बिल थकीत असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सर्व कृषी पंपधारक शेतकऱ्यांचे संपूर्ण वीज बिल माफ करण्याची घोषणा केली. याचा लाभ जिल्ह्यातील या ४५ हजार शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषीपंपधारक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

शेतीचे पंचनामे होणार आता जलदगतीनेनैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याचे पंचनामे होण्यास पूर्वी बराच विलंब लागत होता. परिणामी, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यापासून वंचित राहावे लागत होते. मात्र, नुकसानीचे ई पंचनामे करण्यात येणार असल्याने जलदगतीने पंचनामे होऊन नुकसानभरपाई त्वरित मिळण्यास मदत होणार आहे.

संजय निराधार योजनेचे अनुदान आता दीड हजार रुपयेअर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आता दरमहा दीड हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. पूर्वी १ हजार रुपये अनुदान दिले जात होते. याचा लाभ जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या ४२ हजार ८१४ लाभार्थ्यांना मिळणार आहे.

४२ हजार शेतकऱ्यांचे झाले होते नुकसानजिल्ह्यात गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ४७ हजार २४४ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याने ४२ हजार शेतकरी बाधित झाले होते. या शेतकऱ्यांना सुरुवातीला दोन हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर शासनाने नुकसानभरपाईची मर्यादा ३ हेक्टरपर्यंत वाढविली होती. कृषी विभागाने नोव्हेंबरमधील नुकसानभरपाईसाठी ३६ कोटी २० लाख आणि डिसेंबरमधील नुकसानभरपाईसाठी ३२ कोटी ६३ लाख अशा प्रकारे एकूण ६९ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. आता अर्थसंकल्पातसुद्धा यासाठीची घोषणा करण्यात आली.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfarmingशेतीBudgetअर्थसंकल्प 2024Ajit Pawarअजित पवार