शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

४६ हजार महिलांची सक्षमतेकडे वाटचाल

By admin | Published: October 10, 2015 2:16 AM

चूल आणि मूल या मर्यादित विश्वातून बाहेर येत जिल्ह्यातील सर्वसाधारण महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वत:चा व्यवसाय ...

बचत गटांचा आधार : पदरमोड करून जमविले ८ कोटी ५८ लाखगोंदिया : चूल आणि मूल या मर्यादित विश्वातून बाहेर येत जिल्ह्यातील सर्वसाधारण महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वत:चा व्यवसाय थाटत आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. ग्रामीण भागातील सावित्रीच्या लेकींचे हे कार्य इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) ग्रामीण महिलांना गावपातळीवर संघटित करुन त्यांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक बचतीची सवय लावली आहे. माविमंचे योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षणामुळे अनेक महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी उद्योग व व्यवसायाची कास धरली आहे. सात तालुक्यात विशेष घटक योजना-१७७, सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना- ३५०, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक- ११०, स्वयंसिद्धा योजना-४०, तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम-६९३, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान - २११३ असे एकूण ३८८४ महिलांचे बचत गट माविमंकडून कार्यरत आहेत.उत्पन्न वाढीसाठी सुक्ष्म उपजिविका आराखडा तयार करण्यात आला आहे. बचत गटाच्या माध्यमातून शेळीपालन प्रकल्प, दुग्ध व्यवसाय, सामूहिक शेती, लाख उत्पादन, स्वस्त धान्य दुकान चालविणे, अंगणवाड्यांना आहार पुरवठा करणे, लाकडी नक्षीदार वस्तू तयार करणे, कुक्कुटपालन यासह अन्य उद्योग व्यवसाय बचत गटातील महिला करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)महिलांनी केली आठ कोटींची बचतमहिला आर्थिक विकास महामंडळाने अर्जुनी-मोरगाव तालुका वगळता उर्वरित सात तालुक्यातील ४१६ गावांमध्ये ३८८४ महिला बचत गटांची स्थापना केली. या माध्यमातून ४६ हजार ४७२ महिलांना संघटित करण्यात आले आहे. या महिलांनी पदरमोड करुन पै-पै जमवून तब्बल ८ कोटी ५८ लक्ष ४० हजार रुपयांची बचत केली आहे. बचतीची सवय आणि अंतर्गत पैशाचे आदान-प्रदान बघता बँकांनी छोट्या विविध प्रकारच्या उद्योग-वयवसायासाठी तब्बल ४१ कोटी ७५ लक्ष ३१ हजार ५०० रुपये कर्ज स्वरुपात बचत गटांना उपलब्ध करून दिले आहेत. उद्योग व्यवसाय करण्यास बचत गट सक्षम असल्याचा विश्वास मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन बँकांनी दाखविला आहे. गटांना घेतले ४२.७५ कोटींचे कर्ज उद्योग-व्यवसायासाठी आतापर्यंत ३१६० बचत गटांनी सन २००२ पासून सप्टेंबर २०१५ पर्यंत ४२ कोटी ७५ लक्ष ३१ हजार ५०० रुपयांचे बँक कर्ज घेतले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान माविमंच्या माध्यमातून तिरोडा आणि सालेकसा तालुक्यात राबविण्यात येत आहे. या तालुक्यातील ११३९ बचत गटांना प्रतिबचत गट १५ हजार रुपये याप्रमाणे १ कोटी ७० लक्ष ७५ हजार रुपये फिरता निधी वाटप केला आहे.जिल्ह्यातील ५७१ महिला बचत गटांना आयसीआयसीआय बँकेने सन २०१५-१६ या वर्षात सप्टेंबर २०१५ अखेर ५ कोटी ३७ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. तसेच जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकानी सप्टेंबर अखेर १२७ गटांना ८२ लक्ष ९५ हजार रुपये कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन दिले असल्याची माहिती माविमंचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोेसे यांनी दिली.