शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

वाळू घ्यायची 600 रुपये ब्रासने अन् विकायची सहा हजाराने !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2022 5:00 AM

कोरोना काळात तर १० हजार रुपये प्रति ब्रास प्रमाणे वाळूची विक्री करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात एकूूण २३ वाळू घाट असून, पर्यावरण मंत्रालयाने लिलावासाठी परवानगी न दिल्याने दोन वर्षे रेती घाटांचे लिलाव झाले नव्हते. त्यामुळे वाळू तस्करांना मोकळे रान मिळाले होते. वाळू तस्कारांनी वाळू घाट अक्षरश: पोखरून टाकले. यामुळे जिल्हा प्रशासनाचा जवळपास २५ कोटी रुपयांचा महसूल बुडाला, तर वाळू तस्कर गब्बर झाले. यात काही राजकारण्यांचासुद्धा सहभाग आहे. 

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वाळू घाटाचे लिलाव करून वाळूचे प्रति ब्रास दर शासनाकडून ठरवून दिले जातात. मात्र, ठरवून दिलेल्या दराने संबंधित वाळू घाटाचे कंत्राटदार विक्रीच करीत नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे. वाळू घाटाचा लिलाव करताना ६०० प्रती ब्रासने त्याचा लिलाव केला जातो; मात्र संबंधित ठेकेदार त्याची दहापट अधिक दराने विक्री करतात. कोरोना काळात तर १० हजार रुपये प्रति ब्रास प्रमाणे वाळूची विक्री करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात एकूूण २३ वाळू घाट असून, पर्यावरण मंत्रालयाने लिलावासाठी परवानगी न दिल्याने दोन वर्षे रेती घाटांचे लिलाव झाले नव्हते. त्यामुळे वाळू तस्करांना मोकळे रान मिळाले होते. वाळू तस्कारांनी वाळू घाट अक्षरश: पोखरून टाकले. यामुळे जिल्हा प्रशासनाचा जवळपास २५ कोटी रुपयांचा महसूल बुडाला, तर वाळू तस्कर गब्बर झाले. यात काही राजकारण्यांचासुद्धा सहभाग आहे. वाळू तस्करीच्या भरवशावर त्यांनी जिल्ह्यात आपले साम्राज्य निर्माण केले आहे. वाळू तस्करांच्या मनमानी धोरणाचा सर्वाधिक फटका घरकुल लाभार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना बसला. गरजेपोटी त्यांना ८ ते १० हजार रुपये एक ट्रॅक्टर वाळू घ्यावी लागली. 

२० वाळू घाटांचा लिलाव- पर्यावरण मंडळाने जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावाला तब्बल दोन वर्षांनंतर परवानगी दिली. त्यामुळे या वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे. या घाटांच्या लिलावातून जिल्हा प्रशासनाला १७ कोटी रुपयांचा महसूल मिळणे अपेक्षित आहे.

०३  वाळू घाटांचा  लिलाव बाकी- जिल्ह्यात एकूण २३ वाळू घाट असून, यापैकी २० वाळू घाटांच्या लिलावाला पर्यावरण मंडळाने परवानगी दिली आहे. त्यामुळे या २० घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू आहे, तर तीन वाळू घाटांच्या लिलावाला अद्यापही मंजुरी मिळाली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे या घाटांचा लिलाव उशिरा होणार आहे. 

२० टक्के अनामत रक्कम करावी लागते जमा

वाळू घाटांच्या लिलावासाठी बोली लावून ते खरेदी केल्यानंतर त्या वाळू घाटाच्या एकूण रकमेच्या २० टक्के रक्कम ही संबंधित कंत्राटदाराला शासनाकडे अनामत म्हणून जमा करावी लागत आहे.  

वाळू कंत्राटदारांची भरमसाट कमाई मागील दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव आणि पर्यावरण मंडळाने वाळू घाटांच्या लिलावासाठी हिरवी झेंडी न दिल्याने वाळू तस्कारांनी चांगली कमाई केली, तर शासनाने किती ब्रास दराने वाळूची विक्री करावी हे ठरवून दिले आहे. मात्र, कोणताच कंत्राटदार ठरवून दिलेल्या दराने वाळूची विक्री करीत नसून मनमर्जीनुसार दर आकारून भरमसाट कमी कमाई करीत आहे. 

लिलाव न होता उपसा जोरात वाळू घाटांचे लिलाव झाले नसले तरी वाळू तस्करांनी जिल्ह्यातील रेतीघाट पोखरून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी करणे सुरूच ठेवले आहे. 

भाव कधी बदलेल याचा नेम नाही 

कोरोना काळात आणि त्यानंतर वाळू दर आकाशाला भिडले होते. वाळू घाटांचे लिलाव झाले नसले तरी वाळू तस्कर चोरटी वाहतूक करून आपल्या मनमर्जीनुसार कधी सहा, तर कधी १० हजार, तर कधी १५ हजार रुपये प्रती ट्रॅक्टर दर आकारून वाळूची विक्री करीत होते. बांधकाम करणाऱ्यांची झालेली कोंडी लक्षात घेऊन अधिक दराने वाळूची विक्री करतात. 

 

टॅग्स :sandवाळू