शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

दहा वर्षात ९० हजार प्रौढ साक्षर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 12:35 AM

आदिवासी व नक्षलदृट्या अतिसंवेदनशील जिल्ह्यात केंद्र सरकारच्या प्रौढ साक्षरता अभियानाचा प्रभाव जिल्ह्यात दिसू लागला आहे.मागील दहा वर्षात ९० हजार प्रौढ नवसाक्षर झाले आहेत. आता ते कुणाच्या मदतीशिवाय आपला दैनंदिन आर्थिक व्यवहार सहजरित्या पार पाडत असल्याचे दिलासा दायक चित्र आहे.

ठळक मुद्दे८५ टक्के जिल्हा साक्षर : आदिवासी महिलांमध्ये झाला बदल, प्रेरकांच्या श्रमाचे फलित

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आदिवासी व नक्षलदृट्या अतिसंवेदनशील जिल्ह्यात केंद्र सरकारच्या प्रौढ साक्षरता अभियानाचा प्रभाव जिल्ह्यात दिसू लागला आहे.मागील दहा वर्षात ९० हजार प्रौढ नवसाक्षर झाले आहेत. आता ते कुणाच्या मदतीशिवाय आपला दैनंदिन आर्थिक व्यवहार सहजरित्या पार पाडत असल्याचे दिलासा दायक चित्र आहे.गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख २२ हजार ५०७ आहे. यात ६ लाख ६१ हजार ५५४ पुरूष व ६ लाख ६० हजार ९५३ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्याच्या साक्षरतेचे प्रमाण ८४.९५ टक्के आहे. यात पुरूष ९२.०४ टक्के तर महिलांच्या साक्षरतेची टक्केवारी ७७.८९ टक्के आहे.जिल्ह्यातील सर्व तालुक्यात प्रौढ साक्षरतेचे कार्यक्रम सुरू आहेत. जिल्ह्याच्या निर्मितीला १९ वर्ष लोटले तरीही जिल्ह्यात निरंतर शिक्षण कार्यालय सुरू करण्यात आले नाही. येथील कारभार भंडारावरूनच सुरू आहे.जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ५५० ग्रामपंचायतीत ११०० प्रेरक कार्यरत आहेत. मागील दहा वर्षात या प्रेरकांनी ९० हजार लोकांना साक्षर केले आहे. सालेकसा तालुक्याच्या सातगाव येथील नवसाक्षर रामजी बापू जगने (७२) यांच्या मते आता ते बँकेचा व्यवहार सहजरित्या करू शकतात. सरकारचे साक्षरता अभियान कौतुकास्पद आहे. नवसाक्षर संतकला राधेलाल मोहबे (४८) मजूरी करतात. मजुरीच्या पैश्याचा हिशेब करतात. डाकघरात जाऊन त्या पैसे जमा करतात. नवसाक्षर लीला उदेलाल साखरे (६१) ह्या सुध्दा मजुरी करतात. त्या सुध्दा हिशेब करतात. परंतु त्यांना दररोज शिकविल्या जात नाही अशी त्यांची तक्रार आहे. नवसाक्षर सुलका चिंधू सरजारे (६२) च्या मते त्यांना बरेच काही शिकायला मिळाले. त्यांना डोळ्याने बरोबर दिसत नसले तरी सर्व गोष्टी लक्षात येतात. औषध किंवा इतर व्यवहाराचे बिल घेण्यास त्या विसरत नाहीत.साधन सामुग्रीचा अभावसातगावचे प्रेरक विनोद राधेलाल मोहबे हे डीटीएड, बीएड शिक्षक आहेत. त्यांच्या मते सातगाव येथे ३५ व साखरीटोला येथे ३८ लोक नवसाक्षर झाले आहेत. परंतु प्रौढ शिक्षा अभियानासाठी साधन सामुग्रीचा अभाव आहे. प्रौढ शिक्षणासाठी लोकांना वेळ मिळत नाही. प्रेरकांना २ हजार रूपये महिन्याकाठी असे सहा महिन्याचे मानधन दिले जाते. यामुळे प्रेरकांना त्रास होतो. हे अभियान ९० टक्के यशस्वी झाले आहे. हे अभियान ६ महिन्याऐवजी निरंतर सुरू ठेवण्याची गरज आहे.५० महिन्याचे वेतन नाहीप्रेरक संघटनेच्या सालेकसा तालुकाध्यक्ष सुजाता शिवणकर म्हणतात की, राजकारण्यांच्या दबावामुळे कामावर परिणाम पडतो. मागील ५० महिन्यापासून मानधन देण्यात आले नाही. सद्या एका महिन्याचे मानधन देण्यात आले. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. बॉक्स२ लाख नागरिक निरक्षरगोंदिया जिल्ह्यातील प्रौढ साक्षरतेवर नजर टाकली असता अजूनही जिल्ह्यातील ५२ हजार ६६० पुरूष व १ लाख ४६ हजार १३६ महिला निरक्षर असल्याची बाब पुढे आली आहे. यांना साक्षर करण्यासाठी निरंतर शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

टॅग्स :Educationशिक्षण