शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

अखेर आमसभेचा मुहूर्त निघाला

By admin | Published: January 04, 2016 4:07 AM

वर्षात सहा आमसभा घेणे बंधनकारक असताना नगर परषदेची फक्त एकच आमसभा घेण्यात आली. ही बामती ‘लोकमत’ने

कपिल केकत ल्ल गोंदियावर्षात सहा आमसभा घेणे बंधनकारक असताना नगर परषदेची फक्त एकच आमसभा घेण्यात आली. ही बामती ‘लोकमत’ने ‘वर्षभरात फक्त एकच आमसभा’या मथळ्याखाली २९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली असता येत्या १२ तारखेला नगर परिषदेची आमसभा बोलाविण्यात आली आहे. विशेष म्हणजे या आमसभेसाठी चांगली लांबलचक विषयसूची तयार करण्यात आली आहे. नगर परिषदेतील कोणत्याही विकास व अंतर्गत कामकाजासाठी आमसभेची मंजूरी घेणे आवश्यक आहे. याकरिता दर दोन महिन्यांतून एकदा आमसभा घेणे नगर परिषद अधिनियम १९६५ कलम ८२ अंतर्गत बंधनकारक करण्यात आले आहे. सभेत विविध मुद्दे मांडून सभेची मंजूरी मिळाल्यावरच ती कामे केली जातात. अध्यक्षांच्या मागणीवरून ही आमसभा बोलाविली जात असून सभेची विषयसूची अध्यक्ष तयार करतात. यामुळे वेळेवर आमसभा घेणे ही एक प्रकारे अध्यक्षांचीच जबाबदारी आहे. मात्र अध्यक्षांकडून याकडे लक्ष दिले जात नसल्याने वर्षभरात सहा आमसभा होण्याऐवजी फक्त एकच आमसभा झाली. तर दर महिन्यातून एकदा स्थायी समितीची सभा घेणे बंधनकारक असताना स्थायी समितीचीही फक्त एकच सभा घेण्यात आली आहे. स्थायी समिती व आमसभा होत नसल्याने नगर परिषदेतील विकासकामे व नगर परिषद प्रशासनातील विविध कामे रखडून पडत होती. ११ आॅगस्ट रोजी घेण्यात आलेल्या आमसभेत ६० च्या जवळपास विषय मांडण्यात आले होते. यावरून आमसभा घेणे किती महत्वाचे आहे याची प्रचिती येते. हा विषय ‘लोकमत’ने सातत्याने उचलून धरला व २९ डिसेंबर रोजी ‘वर्षभरात फक्त एकच आमसभा’ या बातमीतून सर्व परिस्थिती माडली. या बातमीची दखल जिल्हाधिकारी डॉ. विजय सुयर्वंशी यांनी घेतली असता स्थायी समिती व आमसभेचा मुहूर्त निघाला. येत्या ११ तारखेला स्थायी समिती व १२ तारखेला आमसभा बोलाविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी यांनी वेळीच दखल घेतल्याने नगराध्यक्षांनी ही आमसभा बोलाविली, अन्यथा सभा कधी झाली असती सांगणे कठीण आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पत्र ४‘लोकमत’ची बातमी बघून जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गुणवंत वाहूरवाघ यांना २९ तारखेलाच पत्र पाठवून ३० तारखेला दुपारी २ वाजता विषयसूची तयार करण्यासाठी कार्यालयात बोलाविले होते. मात्र नगराध्यक्षांनी लगेच विषयसूची तयार केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले व ११ तारखेला स्थायी समिती आणि १२ तारखेला आमसभा बोलाविण्यात आल्याची माहिती आहे. विषयसूचीत ३० हून अधिक विषय ४आमसभेसाठी तयार करण्यात आलेल्या विषयसूचीत ३० हून अधिक विषयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अध्यक्षांनी ठरावीक कालावधीत सभा घेण्यास कसूर केल्यास मुख्याधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना कळवितात. त्यावर जिल्हाधिकारी त्यांना प्राप्त अधिकारातून सभा बोलावू शकतात व येथेही तेच होणार होते. मात्र नगराध्यक्षांनी ऐनवेळी विषयसूची तयार करून घेतली.