शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

तिरोडा तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2017 12:25 AM

यंदा पावसाने दगा दिल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला असून कर्जबाजारी शेतकरी पुन्हा दुष्काळाच्या खाईमध्ये उभा आहे. असे असताना पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होणार तर नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देयंदा पावसाने दगा दिल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला असून कर्जबाजारी शेतकरी पुन्हा दुष्काळाच्या खाईमध्ये उभा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसुकडी/डाकराम : यंदा पावसाने दगा दिल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला असून कर्जबाजारी शेतकरी पुन्हा दुष्काळाच्या खाईमध्ये उभा आहे. असे असताना पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होणार तर नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तिरोडा तालुक्यातील खडकी-डोंगरगाव येथील सेवा सहकारी सोसायटीच्या आमसभेत एकमुखाने तिरोडा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा, असा ठराव घेण्यात आला.सदर ठरावाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री व विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठविण्यात आले. तसेच सहकारी आयुक्त व जिल्हाधिकारी गोंदिया यांना सुध्दा प्रती पाठविण्यात आल्या आहेत.खडकी-डोंगरगाव येथील सेवा सहकारी सोसायटीची आमसभा पार पडली. अध्यक्षस्थानी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष शिशुपाल पटले होते. अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडाचे सभापती डॉ. चिंतामन रहागडाले, माजी सभापती वाय.टी. कटरे, सेवा सहकारी सुकडीचे अध्यक्ष विलास मेश्राम, तालुका काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष एच.डी. जांभूळकर, छबीलाल पटले, पारस पटले, कटरे, तेजराम चव्हाण, जयप्रकाश खोब्रागडे, खोब्रागडे, रमेश कटरे, यादोराव कटरे, बुधन पटले, मोहनलाल कटरे, जगदिश मुखेर, अरुण पटले, महादेव रहांगडाले, पप्पू कटरे, प्रकाश कटरे, शीला टेंभरे, लाला गजभिये, बंसोड, सर्व शेतकरी व गावकरी उपस्थित होते.या वेळी सर्व शेतकºयांना कृषी बाजार समितीचे सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले यांच्या हस्ते स्टील कटोरी वाटप करुन सत्कार करण्यात आला. आमसभेचे कार्यवृत्तांत सचिव जयप्रकाश खोब्रागडे यांनी सादर केले. प्रास्ताविक साहेबराव बंसोड यांनी मांडले. संचालन रविंद्र बंसोड यांनी केले. आभार लाला गजभिये यांनी मानले. कार्यक्रमासाठी खडकी-डोंगरगाव येथील शेतकरी व तरूणांनी सहकार्य केले.