शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
6
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
7
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
8
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
9
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
10
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
11
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
12
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
13
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
14
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
15
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
16
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
18
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
19
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
20
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट

पाण्याचा अपव्यय टाळा

By admin | Published: April 03, 2016 3:51 AM

पृथ्वीतलावर सागर, महासागरामध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असले तरी मानव व इतर प्राणीमात्रांना हवे असलेले पाणी अत्यल्प आहे.

आवाहन : जलजागृती साक्षरता कार्यक्रम इटखेडा : पृथ्वीतलावर सागर, महासागरामध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असले तरी मानव व इतर प्राणीमात्रांना हवे असलेले पाणी अत्यल्प आहे. पिण्यायोग्य पाण्याची निर्मिती करणे अशक्य आहे. पाऊस पडत नसल्याने देशाच्या कोणत्यातरी भागात दरवर्षी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. पाण्याअभावी माणसे, पशुपक्षी व पिकांचे जीवन धोक्यात आले आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यये टाळणे आता गरजेचे आहे.दुष्काळ पडला की सर्वत्र बोंबाबोंब सुरू होते. पाण्यासाठी माणसांमध्ये भांडणे व हाणामाऱ्या होत आहेत. जंगल परिसरातील पाण्याचे साठे आटल्यामुळे जंगली प्राणी मनुष्यवस्तीवर आक्रमण करीत आहेत. भविष्यात पाण्यासाठी युद्धे होतील. मानवी जीवनावर विघातक परिणाम होणाऱ्या गंभीर बाबींची दखल घेण्याची गरज निर्माण झाल्याने महाराष्ट्र शासनाने जनतेमध्ये जलजागृती करण्यासाठी सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले. त्या अन्वये समृध्दी पाणी वापर संस्था व ग्रामपंचायत इटखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या कार्यक्रमात अतिथीनी सदर मनोगत व्यक्त केले. मर्यादीत स्वरूपात असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करण्याच्या गरजेवर भर दिला. पाण्याच्या अनिर्बंध गैरवापरामुळे पाण्याची मोठी गंभीर समस्या निर्माण होण्यापूर्वी प्रत्येक नागरिकांमध्ये जलजागृती व जलसाक्षरता निर्माण व्हावी व पाण्याचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले.उद्घाटनप्रसंगी जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, मनोहरराव चंद्रिकापुरे, पं.स. उपसभापती आशा झिलपे, माजी सभापती उमाकांत ढेंगे, सरपंच अस्मिता वैद्य, उपसरपंच वासुदेवराव उके, प्राचार्य लहू बोळणे, सुभाष देशमुख, इंद्रदास झिलपे, देवीदान पालीवाल, पुंडलिक धोटे, पोलीस पाटील विकास लांडगे, पुंडलिक धोेटे, शाखा अभियंता एस.व्ही. भवरे, समृध्दी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष विलास भावे, सचिव विजय मेश्राम, मोरेश्वर गोंडाणे, शालिकराम भोयर, दामोधर चांदेवार, शालिकराम हुकरे, लिना येरणे, सुशिला गोंडाणे, चेतन शेंडे, प्रकाश रामटेके, तालुका कृषी अधिकारी मुनेश्वर, ए.एन. चव्हाण, सिध्दार्थ सुखदेवे, जे.एम. ठेंगरी यांच्यासह ग्रामस्थ बंधु-भगिनींची उपस्थिती होती. प्रास्ताविक माजी अध्यक्ष देविदान पालीवाल यांनी मांडले. संचालन करून आभार मोरेश्वर गोंडाणे यांनी मानले. ग्रामपंचायत, समृध्दी पाणी वापर संस्था, इसापूर, इटखेडा हायस्कूल, स्वामी विवेकानंद विद्यालय व जि.प. प्राथमिक शाळा, ग्रामस्थ व पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थ्यांनी जलजागृतीसाठी गावातील रस्त्यावरून पदयात्रा काढली.