शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

आरक्षणविरोधी काळा कायदा रद्द करा

By admin | Published: June 30, 2017 1:31 AM

काही महिन्यापूर्वी उच्च न्यायालयात आरक्षणाबाबत ओबीसी, एससी, एसटी, एनटी, एसबीसी लोकांवर अन्याय व आघात करणारा निर्णय झाला आहे.

शिवणकर : जनआंदोलन उभारण्याचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : काही महिन्यापूर्वी उच्च न्यायालयात आरक्षणाबाबत ओबीसी, एससी, एसटी, एनटी, एसबीसी लोकांवर अन्याय व आघात करणारा निर्णय झाला आहे. हा निर्णय केंद्र शासनाने तत्काळ रद्द करण्याविषयीची कार्यवाही करावी अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांनी दिला आहे.सदर निर्णय ओबीसी, एससी, एसटी, एनटी, एसबीसी यांच्या विरोधात असून शेतकरीविरोधीसुद्धा आहे. शेती करणारेसुद्धा साधारणत: ९० टक्के लोक याच प्रवर्गातील आहेत. खुल्या (ओपन) वर्गात मोडणाऱ्या जातीच्या लोकांचे शेती व्यवसाय करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे शेती करणाऱ्या ओबीसी, एससी, एसटी, एनटी व एसबीसी लोकांबाबत अन्यायकारक भूमिका केंद्र व राज्य शासन घेत आहे. न्यायालयात सत्ताधारी पक्षाने योग्य पद्धतीने मागासवर्गीयांची बाजू ठेवली नसल्याचे दिसून येते, असे शिवणकर यांनी कळविले आहे.या निर्णयाद्वारे आता ज्या वर्गातील लोकांसाठी आरक्षण जितके ठरविले आहे, त्याच वर्गात त्यांना आरक्षणाचा लाभ मिळेल. ओबीसी, एससी, एसटी, एनटी, एसबीसी या वर्गातील लोकांना ओपनमध्ये लाभ घेता येणार नाही, हा अन्याय आहे. एखाद्या ओबीसी विद्यार्थ्याने ९८ टक्के गुण प्राप्त केले तर त्याला मेरीटनुसार प्राधान न देता, ओबीसी प्रवर्गातच प्राधान्यक्रम देण्यात येईल. तसेच एससी, एसटी, एनटी व एसबीसी विद्यार्थ्यांनाही लागू होईल. परंतु कितीही जास्त गुण प्राप्त केले तरी त्यांना मेरीटनुसार ओपनमध्ये प्राधान्य देण्यात येणार नाही. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्याने ९८ टक्के गुण मिळविले तरी मेरीटनुसार प्राधान्य न दिल्यामुळे त्यापेक्षा कमी गुण असलेल्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जास्त लाभ मिळेल.देशात ओबीसी, एससी, एसटी, एनटी व एसबीसीची लोकसंख्या ८० टक्के असून या निर्णयामुळे या सर्व वर्गांना ५० टक्के आरक्षण मिळेल. तसेच जे २० टक्के ओपनमध्ये जाती आहेत त्यांना ५० टक्के आरक्षण मिळेल. म्हणजे २० टक्के ओपनच्या जातींना ५० टक्के व ८० टक्के मागासवर्गीय जातींना ५० टक्के आरक्षण मिळेल.वास्तविक मेरीटमध्ये असलेल्या कुठल्याही वर्गातील विद्यार्थ्यांना मेरीटनुसार लाभ मिळायला हवा. नोकरीमध्येसुद्धा अशाचप्रकारे आरक्षण राहणार असून ही बाब लोकांच्या समोर आलेली नाही. हा निर्णय संविधानाच्या विरोधात असून राज्य व केंद्र शासनाने आपले धोरण स्पष्ट करावे, अशी मागणी शिवणकर यांनी केली आहे.लोकसभा व विधान सभेत मागासवर्गीयांचे अनेक नेते असूनसुद्धा एकानेही याबाबत तोंड उघडले नाही. मागासवर्गीय व शेतकरीविरोधी निर्णय सरकारने तात्काळ रद्द करण्याविषयी कार्यवाही करावी, अशी मागणी माजी जि.प. अध्यक्ष विजय महादेवराव शिवणकर यांनी केली आहे.