शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
2
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
3
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
4
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
5
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
6
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
7
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
8
रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; "माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण..."
9
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
10
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
11
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही
12
“शिंदेंनी सूरत, गुवाहाटी किंवा कामाख्या मंदिरासमोर दसरा मेळावा घ्यावा”; संजय राऊतांचा टोला
13
बांगलादेशचा डाव २३३ धावांत आटोपला; टीम इंडियाकडे 'वनडे स्टाईल'मध्ये कसोटी जिंकण्याची संधी
14
Share Market Live Update : शेअर बाजारात हाहाकार, Sensex १००० अंकांपेक्षा अधिक आपटला; २७९ कंपन्यांच्या शेअर्सना लोअर सर्किट
15
500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो, खुद्द अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ
16
तुम्ही लढत बसाल, वकील खुश होतील; घटस्फोटाच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश काय बोलले?
17
"आपण आपल्या प्रकृतीच्या बाबतीत PM मोदींना विनाकारण ओढलं, प्रार्थना करतो की...'; शाह यांचा खर्गेंवर पलटवार
18
नसरल्लाहच्या मृत्यूचे पडसाद भारतात उमटले; लखनौला शेकडो लोक रस्त्यावर उतरले
19
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
20
अखेर Ashneer Grover यांनी BharatPe सोबतचा वाद सोडवला, काय झाली दोघांमध्ये डील?

ओबीसी आरक्षण रद्द होण्यास केंद्र सरकार जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 4:19 AM

गोंदिया : राज्यातील ओबीसी आरक्षण रद्द होण्यास केवळ केंद्र सरकारच जबाबदार असून, आता मात्र आंदाेलन करून भाजप जनतेची दिशाभूल ...

गोंदिया : राज्यातील ओबीसी आरक्षण रद्द होण्यास केवळ केंद्र सरकारच जबाबदार असून, आता मात्र आंदाेलन करून भाजप जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारचा जिल्हा काँग्रेस कमिटीने शुक्रवारी (दि. २५) शहरातील जयस्तंभ चौकात निदर्शने करून निषेध नोंदविला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरिकांचा मागास प्रवर्ग या सदराखाली अनु. जाती जमाती व्यतिरिक्त इतर मागासवर्गीयांना आरक्षण दिले जात होते. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रतिनिधित्व करण्याची संधी चालत आलेली होती. परंतु, अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार ना. मा. प्र.चे म्हणजेच ओबीसींचे आरक्षण रद्द ठरविण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारकडून ओबीसींची लोकसंख्या, मागासलेपण व प्रतिनिधित्व याबद्दलचा इंपिरिकल डाटा मागितला होता. परंतु, तो केंद्र सरकारकडे असूनदेखील सादर करण्यात आला नाही. त्यामुळेच ओबीसी आरक्षण रद्द झाले.

यास सर्वस्वी तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार व केंद्रातील मोदी सरकारच जवाबदार असल्याचा आरोप केला. हा निषेध गोंदिया शहर काँग्रेस कमिटी, गोंदिया तालुका काँग्रेस कमिटी, सेवादल, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, ओबीसी काँग्रेस, किसान काँग्रेस, अनु. जाती विभाग, अल्पसंख्याक विभागाच्या वतीने करण्यात आला. शहीद भोला काँग्रेस भवन येथे प्रथम राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. शहीद भोला काँग्रेस भवन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत मार्च काढण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष डॉ. एन. डी. किरसान, प्रदेश सचिव अमर वराडे, जहीरभाई अहमद, सूर्यप्रकाश भगत, आलोक मोहंती, हरीष तुळसकर, अशोक गुप्ता, जितेंद्र कटरे, जीतेश राणे, नीलम हलमारे, योगेश अग्रवाल, बाबा मिश्रा, राजकुमार पटेल, रेखा बानेवार, आशिष नागपुरे, डॉ. लक्ष्मीकांत वाघमारे, आशिष रहांगडाले, सचिन मेश्राम, वंदना काळे यांनी केले, तर तिरोडा येथे माजी आ. दिलीप बन्सोड यांच्या नेतृत्वात आंदोलन केले.