शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

६० दिवसांत ६.१६ कोटींचे काम पूर्ण

By admin | Published: June 24, 2017 1:46 AM

सन २०१७-१८ मध्ये तिरोडा मग्रारोहयो अंतर्गत दररोज ११ हजार ५०० मजुरांना दोनशेच्या वर कामांमध्ये सामावून घेण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क काचेवानी : सन २०१७-१८ मध्ये तिरोडा मग्रारोहयो अंतर्गत दररोज ११ हजार ५०० मजुरांना दोनशेच्या वर कामांमध्ये सामावून घेण्यात आले. ६० दिवसांत म्हणजे १५ जूनपर्यंत सहा कोटी १६ लाख रूपये खर्च करण्यात आले. संपूर्ण कामे सुरळीत पार पडली तरी कामावर तीन वर्षांत तीन मजुरांचा मृत्यू झाला. यापैकी दोघांना लाभ देण्यात आला तर एका कुटुंबाने मृत्यू दावा घेण्यास नकार दिला. तिरोडा तालुक्यात मग्रारोहयो अंतर्गत कालवा दुरूस्ती, नाला सरळीकरण, पांदण रस्ता, तलाव खोलीकरण, शौचालय, घरकूल, गुरांचे गोठे बांधकाम व विहीर बांधकाम अशी अनेक कामे आर्थिक वर्ष १ एप्रिल २०१७ ते १५ जून २०१७ पर्यंत करण्यात आले. यात प्रत्येक दिवसाला सरासरी ११ हजार ५०० मजुरांना कामाचा लाभ घेता आला. आठवडी बाजाराकरिता एक दिवसाची सुट्टी वगळता महिन्यात २४ दिवस मजुरांना काम देण्यात आले. एप्रिल महिन्यात एकूण २१४ काम सुरू होते. या कामावर दरदिवसी नऊ हजार ७९५ मजुरांनी काम केलेले आहे. मे २०१७ मध्ये १६९ कामे सुरू होते. यावर दर दिवसाला ११ हजार ९७७ मजुरांना काम देण्यात आले. तर जून २०१७ मध्ये १५७ कामे सुरू होते. यात दरदिवसी १० हजार ते सर्वाधिक १३ हजार ५७७ मजुरांनी काम केले आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये तिरोडा तालुक्यात मग्रारोहयोंतर्गत जिल्ह्यातून सर्वाधिक कामे झाल्याची माहिती आहे. आजपर्यंत खर्च करण्यात आलेल्या कामाच्या निधीनुसार सर्वच कामे पूर्ण झाले का, याबाबत चौकशी केली असता काही कामे अपूर्ण असल्याची माहिती पंचायत समितीच्या सूत्रांनी दिली. तसेच मजुरांना वेतन देण्यास निधी कमी पडला नसल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु कुशल साहित्याचा निधी डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ पर्यंत उपलब्ध झाला नसल्याने अडचण निर्माण झाली होती. मात्र आता सर्व सुरळीत झाल्याचे सहायक कार्यक्रम अधिकारी एल.डी. चव्हाण यांनी लोकमतला सांगितले. किती मजुरांना ९० दिवस काम मिळाले, या प्रश्नाच्या उत्तरात चव्हाण यांनी सांगितले की, दिवसांची परिगणना १ एप्रिल ते ३१ मार्च या दरम्यान केली जाते. सन २०१६-१७ मध्ये तीन हजार ५०० मजुरांना ९० दिवस काम मिळाले होते. रोजगार सेवकांनी ९० दिवसांचे काम पूर्ण करणाऱ्यांची यादी तयार करून कामगार कल्याण आयुक्तालयात नोंदणी केली जाते. ज्यांनी नोंदणी केली त्यांना शासनाकडून घोषित योजनांचा लाभ दिला जातो, असेही कार्यक्रम अधिकारी एल.डी. चव्हाण यांनी सांगितले. मृत महिलेच्या कुटुंबाने लाभ नाकारला तिरोडा तालुक्यात मग्रारोहयोंतर्गत सुरू असलेल्या कामावर तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. यात २०१५-१६ या आर्थिक वर्षात बिहिरीया येथील लखन भदू शहारे यांचा मृत्यू झाला होता. त्यांना शासनातर्फे ५० हजार रूपयांची मदत देण्यात आली होती. २०१६-१७ या आर्थिक वर्षात सीतेपार येथील बलीराम नागो रोकडे यांचा मृत्यू १९ मे २०१६ रोजी कामावर असताना झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांनासुद्धा मृत्यू लाभाची रक्कम देण्यात आली होती. तर यावर्षी २०१७-१८ मध्ये करटी येथील तरासन विठोबा पटले (५५) या महिलेचा ३० मे २०१७ रोजी दुपारी ३.३० वाजता कामावर असताना प्रकृती बिघडली. तिला उपचारासाठी नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीसाठी नकार दिल्याने त्या कुटुंबाला आर्थिक दावा देण्यात आला नाही. सदर मृत महिलेच्या कुटुंबीयांनी तसे लेखी लिहून दिले आहे.