शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
2
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
3
शरद पवार शिंदे गटाला धक्का देणार! तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
4
विरुष्काचे अनोखे 'क्रिकेट'! अनुष्काने वाचला नियमांचा पाढा; विराटने डोक्यालाच हात लावला
5
इस्त्रायलचे 'ते' ३ मित्र जे संकटात बनतात सुरक्षा कवच; ज्यांनी इराण हल्ल्यातून वाचवले
6
IPO News : आयपीओंचा महापूर येणार, एकाच दिवसात १३ कंपन्यांनी सेबीकडे केले अर्ज
7
बिहार : हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडले; अंगावर काटा आणणारे दृश्य, पूरस्थिती कायम
8
Mohammad Shami, Team India, IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमी रूग्णालयात, ६ ते ८ आठवड्यांसाठी सक्तीची विश्रांती
9
काही लोक गांधीजींचा विचार विसरले, फक्त त्यांच्या नावाने मते घेतली; मोदींचा टोला
10
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
11
अरे बापरे! 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्लीत चार जणांना अटक
12
५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त
13
अरे बापरे! लोकांच्या डोळ्यातून येतंय रक्त; खतरनाक इबोलासारखा जीवघेणा आहे 'हा' व्हायरस
14
लाडक्या बहि‍णींची दिवाळी; भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरलाच, सरकार नोव्हेंबरचे पैसे आधीच देणार
15
प्रशांत किशोर : UN मध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्ष... आठ पक्षांसोबत केलंय काम!
16
56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य
17
"हानिया अन् हसन नसरल्लाह...", इस्रायलवरील मिसाइल हल्ल्यानंतर काय म्हणाला इराण?
18
Numerology: ‘या’ ७ मूलांकांवर देवीची कृपा, सुख-समृद्धीचा लाभ; कामात यश, अचानक धनलाभ!
19
भयानक! रोलर कोस्टरवरची मजा बेतली जीवावर; ५ वर्षांच्या मुलाला आला कार्डिएक अरेस्ट
20
सणासुदीत विना टेन्शन खरेदी करू शकाल इलेक्ट्रिक गाड्या, सरकारनं सुरू केली नवी सब्सिडी स्कीम

अवघ्या जिल्ह्यालाच कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:53 AM

गोंदिया : मध्यंतरी नियंत्रणात आलेल्या कोरोनामुळे जिल्ह्यातील ५ तालुके कोरोनामुक्त झाले होते. मात्र, आता मागील महिन्यापासून पुन्हा एकदा कोरोनाचा ...

गोंदिया : मध्यंतरी नियंत्रणात आलेल्या कोरोनामुळे जिल्ह्यातील ५ तालुके कोरोनामुक्त झाले होते. मात्र, आता मागील महिन्यापासून पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक वाढू लागला असल्याने, कोरोनामुक्त झालेल्या तालुक्यांतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. परिणामी, आज जिल्ह्यातील सर्वच तालुके पुन्हा एकदा कोरोनाग्रस्त झाले असून, अवघ्या जिल्ह्यालाच कोरोनाची लागण झाली आहे.

मध्यंतरी जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असताना दररोज २-४ बाधित आढळून येत होते. परिणामी, क्रियाशील रुग्णांची संख्याही झपाट्याने कमी झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील ५ तालुके कोरोनामुक्त झाले होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा एकदा अवघ्या राज्यातच कोरोनाने कहर करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची आकडेवारी सातत्याने वाढताना दिसत आहे. हळुवार का असेना. मात्र, बाधितांची संख्या दररोज वाढू लागली असून, यामुळे आता कोरोनामुक्त झालेल्या तालुक्यांत पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

जिल्ह्यात गुरुवारपर्यंत १४,६२४ बाधितांची नोंद घेण्यात आली होती. त्यातील १४,२५३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानंतर आता १८४ रुग्ण क्रियाशील आहेत. विशेष म्हणजे, क्रियाशील रुग्णांची ही आकडेवारी ५०च्या आत आली होती. मात्र, आता तीच आकडेवारी झपाट्याने वाढू लागली आहे. यावरून कोरोना जिल्ह्यातही आपले पाय पसरत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यात आता एकही तालुका कोरोनामुक्त राहिलेला नाही. यावरून येणारा धोका बघता, आतापासूनच सावध राहण्याची गरज आहे.

--------------------------

कारवायांची आता खरी गरज

कोरोनाचा वाढता धोका बघता, आता जिल्हा प्रशासनाने मास्क न लावणारे, शारीरिक अंतराचे पालन न करणारे, लग्न सोहळे व अन्य गर्दींच्या कार्यक्रमावर कारवाया करण्याची खरी गरज दिसून आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यंतरी याबाबत आदेश काढले होते व मात्र त्यानंतरही काहीच होत नसल्याने नागरिक बिनधास्त असून, कोरोना नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत. मात्र, हा प्रकार अंगलट येण्यासारखा असल्याने, गोंदियाची परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने हालचाल सुरू केली पाहिजे.

--------------------

बाजारात होते एकच गर्दी

कोरोनावर तोडगा म्हणून तोंडावर मास्क व शारीरिक अंतराचे पालन हे दोन प्रभावी शस्त्र आहे. मात्र, गोंदियातील बाजारात बघता कोरोना पूर्णपणे संपल्यासारखे चित्र असून, येथे मास्क व शारीरिक अंतराचे पालन या नियमांना तिलांजली दिली जात आहे. हा प्रकार धोकादायक असल्याने जिल्हा प्रशासनाने आता पूर्वीप्रमाणे पथक गठीत करून कारवायांना सुरुवात केली, तरच यावर आळा घालता येणार आहे, अन्यथा येणारा काळ जिल्ह्यासाठी धोक्याचा राहणार, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.