शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

शहरातील जीर्ण इमारती पाडून टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 4:20 AM

गोंदिया : नगर परिषदेने शहरातील जुन्या झालेल्या जीर्ण इमारती पडून त्यामुळे जीवितहानी होऊ नये यासाठी अशा जीर्ण इमारत मालकांना ...

गोंदिया : नगर परिषदेने शहरातील जुन्या झालेल्या जीर्ण इमारती पडून त्यामुळे जीवितहानी होऊ नये यासाठी अशा जीर्ण इमारत मालकांना नोटीस बजावून जीर्ण इमारत पाडण्याबाबत कळविले होते. मात्र त्यांनतरही त्याला घेऊन कित्येकांकडून काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसत आहे. अशात नगर परिषदेने आता अशा इमारत मालकांना दुसऱ्यांदा नोटीस बजावले असून यानंतर मात्र थेट कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट संकेतच दिले आहेत.

कित्येक वर्षांचे जुने बांधकाम असलेल्या इमारतींना पावसाळ्यात सर्वाधिक धोका असतो. पावसाळ्यात अशा इमारती पडून कित्येकांचा जीव गेल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. अशात पावसाळा बघता नगर परिषदेच्या नगर रचना विभागाने अशा जीर्ण इमारतींपासून जीवित व वित्तहानी घडू नये यासाठी शहरातील जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण करवून घेत जीर्ण इमारत मालकांना नोटीस बजावले होते. नोटिसीनुसार त्यांना अशा जीर्ण इमारत किंवा त्यांचा धोकादायक स्थितीत आलेला भाग पाडून घेण्यास सांगितले होते. जेणेकरून इमारतीत राहणाऱ्यांना किंवा रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना त्यापासून धोका होणार नाही. मात्र नोटीस दिल्यानंतरही कित्येकांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही.

आतापर्यंत पावसाने आपले रूप दाखविले नाही. मात्र येत्या काळात पाऊस बरसणार व तेव्हा अशा इमारतींपासून धोका होऊ नये म्हणून नगर रचना विभागाने आता अशा जीर्ण इमारत मालकांना दुसऱ्यांदा नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र नगर पालिका अधिनियम १९९६ कलम १९५ व २१९ नुसार हे नोटीस बजावण्यात आले असून यानंतर आता मात्र कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

---------------------------------

सर्वेक्षणात १२३ इमारतींची नोंद

नगर परिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १२३ जीर्ण इमारतींची नोंद घेण्यात आली असून त्यांना नगर रचना विभागाने नोटीस बजावले आहे. आता दुसऱ्यांदा त्यांना नोटीस बजावण्याचे काम सुरू असून सोबतच सर्वेक्षणानुसार आणखी नोटीस पाठविले जात आहेत. या इमारत मालकांना आता यापुढे नोटीस न देता थेट केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी कळविले आहे.