शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

नगरसेवकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:15 AM

मागील वर्षी निवेदन देऊनही प्रभागातील समस्या मार्गी न लागल्याने शहरातील प्रभाग क्रमांक २० चे नगरसेवक सुनील तिवारी यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच मंगळवारी (दि.१०) धरणे आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्देवर्षभरापासून मागणी प्रलंबित : नगर परिषदेचा गलथान कारभार उघड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षी निवेदन देऊनही प्रभागातील समस्या मार्गी न लागल्याने शहरातील प्रभाग क्रमांक २० चे नगरसेवक सुनील तिवारी यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच मंगळवारी (दि.१०) धरणे आंदोलन सुरू केले आहे. कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक असलेले तिवारी यांच्यासोबत पक्षातील अन्य नगरसेवक व पदाधिकारी सहभागी झाले. दरम्यान नगरसेवकाला समस्या मार्गी लागत नसल्याचे धरणे आंदोलन करावे लागत असेल तर शहरातील नागरिकांचे काय? असा सवाल देखील यामुळे उपस्थित केला जात आहे.शहरातील प्रभाग क्रमांक २० चे नगरसेवक असलेले तिवारी यांनी प्रभागातील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेत तीन नवीन पाणी टाक्या, एक बोअरवेल व एक टाकी दुरूस्त करून देण्याची मागणी केली होती. यासाठी त्यांनी १५ मार्च २०१७ रोजी म्हणजेच मागील वर्षी नगराध्यक्षांना निवेदन दिले होते. नगराध्यक्ष अशोक इंगळे व मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत आठ दिवसांत मागण्यांची पूर्तता करणार असे आश्वासनही दिले होते असे तिवारी यांनी सांगीतले. मात्र आता वर्षभरापेक्षा जास्त कालावधी लोटूनही तिवारी यांच्या मागण्यांची पूर्तता झाली नाही. यंदा शहरात पाण्याची टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांना याची झळ बसू नये, यासाठी तिवारी यांनी कुणालाही विनवणी करण्यापेक्षा मंगळवारी (दि.१०) थेट मुख्याधिकारी पाटील व नगराध्यक्ष इंगळे यांच्या कक्षासमोर धरणे आंदोलन सुरू केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत कॉंग्रेस पक्षाचे गट नेता व सभापती शकील मंसुरी, कॉंग्रेस कमिटी शहर अध्यक्ष अशोक चौधरी, नगरसेवक भागवत मेश्राम, देवा रूसे, आलोक मोहंती, संदीप रहांगडाले, हरीश तुळसकर, रोहन रंगारी, निकेतन अंबादे, हिमांशू सोनकुसरे, गौरव चन्नेकर, शुभम सहारे, निक्की येडे व कार्यकर्ते उपस्थित होते.पालिकेच्या अकार्यक्षम कारभाराची प्रचितीमागील वर्षी करण्यात आलेल्या मागण्यांची पूर्तता होत नाही. विशेष म्हणजे, आता नगरसेवकांच्याच मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नगरसेवकांना धरणे द्यावे लागत आहे. त्यामुळे या प्रकारातून पालिकेचा कारभार किती सुरळीत सुरू आहे अशी प्रतिक्रीया नगर परिषद वर्तुळात उमटू लागल्या आहे. नगरसेवकांनाच आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाची पाळी आली असताना सर्वसामान्यांच्या समस्यांचे काय असा सवालही उपस्थित केला जात आहे.नगराध्यक्षांकडून मनधरणीचा प्रयत्नतिवारी धरणे देऊन बसले असतानाच नगराध्यक्ष इंगळे कार्यालयात आले. हा प्रकार बघून त्यांनी तिवारी व उपस्थित अन्य सदस्य व कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कक्षात या चर्चा करू असे म्हणत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र वर्षभरापासून मागण्यांची पूर्तता होत नसल्याने चांगलेच रागावलेले तिवारी यांनी कक्षात जाण्याचे टाळले. जोपर्यंत मागण्याची पूर्तता होत नाही तोपर्यंत धरणे सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.