शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
5
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
6
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
7
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
8
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
9
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
10
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
11
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
12
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
13
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
14
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
15
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
16
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
17
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
18
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
19
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
20
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु

सरकारच्या कथनी व करणीत फरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 9:26 PM

शेतकऱ्यांची हितेशी असल्याचे सांगत असलेल्या सरकारच्या कथनी व करनीत फरक असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त असल्याचा आरोप माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केला.

ठळक मुद्देराजेंद्र जैन : तहसील कार्यालयावर हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : शेतकऱ्यांची हितेशी असल्याचे सांगत असलेल्या सरकारच्या कथनी व करनीत फरक असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त असल्याचा आरोप माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केला.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने २५ डिसेंबरपासून सुरू असलेल्या शेतकरी सन्मान यात्रेचा शनिवारी (दि.३०) समारोप करीत येथील तहसील कार्यालयावरील हल्लाबोल आंदोलनात ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार दिलीप बंसोड, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे, देवेंद्रनाथ चौबे, तालुकाध्यक्ष डॉ.अविनाश काशिवार, जिल्हा बँक संचालक गजानन परशुरामकर, जिल्हा परिषद सदस्य रमेश चुऱ्हे, हिरालाल चव्हाण, आर.टी.शहा, छाया चव्हाण, लक्ष्मण चंद्रिकापुरे, सुरेश हर्षे, मिलन राऊत, रित लांजेवार, शशिकला टेंभूर्णे, देवचंद तरोणे, लक्ष्मण लंजे, रूपविलास कुरसुंगे, मुनीश्वर कापगते, जीवन लंजे, रजनी गिरेपुंजे, रेखा कोसलकर, शिवाजी गहाणे, कृष्णा ठलाल, आनंद इळपाते, पी.यू.रहांगडाले, दिनेश कोरे, छाया मरसकोल्हे, सचिन येसनसुरे, अनिता बांबोळे यांच्यासह मोठ्या संख्येत शेतकरी उपस्थित होते.याप्रसंगी चंद्रिकापुरे यांनी, शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सरकार गंभीर नाही. त्यामुळेच शेतकरी आज भरडत चालला आहे. मात्र शेतकºयांच्या हितार्थ असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मागण्यांची पूर्तता होत नाही तोवर आम्ही शांत बसणार नाही असे सांगीतले.तहसीलदारांना दिले निवेदन व जेलभरो आंदोलनया आंदोलनांतर्गत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे, पीक विमा योजनेचा लाभ देण्यात यावा, धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या खर्चाच्या प्रमाणात दीड पट भाव द्यावा, मासेमार संस्थांना होणाºया नुकसानीला बघता संस्थांना आर्थिक मदत द्यावी, रोजगार हमी योजनेची कामे त्वरीत सुरू करून शेतकरी व शेतमजुरांना काम उपलब्ध करवून द्या, उस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाचे योग्य दर द्यावे, शेतकरी-शेतमजूर व विद्यार्थ्यांना लागणाºया विविध दाखल्यांची अट रद्द करून तलाठ्यांमार्फत दाखले देण्याचे आदेश द्यावे, कृषी पंपांचे बिल सरसकट माफ करावे आदि मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच उपस्थित समस्त पदाधिकारी, कार्यकर्ता व शेतकऱ्यांनी जेलभरो आंदोलनांतर्गत स्वत:ला अटक करवून घेतली.