शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

आठ ग्रामपंचायती ठरविणार जि.प.निवडणुकीची दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2021 18:37 IST

आमगाव नगर परिषदेतील आठही ग्रामपंचायतींची संख्या १८ हजारांवर आहे. त्यामुळे नगर परिषद झाल्यास या तालुक्यातील एक सर्कल कमी होईल. मात्र, या ग्रामपंचायतींनी अद्यापही नगर परिषदेत समाविष्ट होण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिलेले नाही.

ठळक मुद्देआमगाव येथील घटणार तर गोरेगावमध्ये वाढणार : वेध जिल्हा परिषद निवडणुकीचे

गोंदिया : आमगाव नगर परिषद की नगर पंचायत याचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. तर नगर परिषद समाविष्ट होण्यास आठ ग्रामपंचायतीने अद्यापही नाहरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. त्यामुळे जोपर्यंत हा तिढा सुटत नाही आणि या आठ ग्रामपंचायती आपली भूमिका स्पष्ट करणार नाहीत, तोपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकांची दिशा स्पष्ट होणार नाही.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पदाधिकारी सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ मागील वर्षी १५ जुलैला संपला. मात्र, कोरोनाचा शिरकाव झाल्याने लॉकडाऊन करण्यात आले. यानंतर ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर गेल्या. परिणामी, निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणुका अद्यापही घोषित केल्या नाही. त्यामुळेच मागील दीड वर्षांपासून जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकाच्या भरवश्यावर सुरू आहे.

गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत एकूण ५३ सर्कल आहे. आमगाव नगर परिषद झाल्यास आमगाव तालुक्यातील एक सर्कल कमी होणार आहे. तसे झाल्यास गोरेगाव तालुक्यात एक सर्कल वाढेल. जिल्हा परिषदेचा एक सर्कल १६ हजार मतदारांचा असतो. मात्र, आमगाव नगर परिषदेत लगतच्या पद्ममपूर, रिसामा, कुंभारटोली, बिरसी, किडंगीपार, बनगाव, माल्ही, आमगाव या ग्रामपंचायतींचा समावेश असून, या आठही ग्रामपंचायतींची संख्या १८ हजारावर आहे. त्यामुळे नगर परिषद झाल्यास या तालुक्यातील एक सर्कल कमी होईल; मात्र या ग्रामपंचायतींनी अद्यापही नगर परिषदेत समाविष्ट होण्यासाठी अद्यापही नाहरकत प्रमाणपत्र दिले नाही.

ग्रामपंचायतींनी हीच भूमिका कायम ठेवल्यास आणि न्यायालयात गेल्यास पुन्हा पेच निर्माण होऊन निवडणुका लांबणीवर जावू शकतात. तर नवीन सर्कल तयार झाल्यास नव्याने आरक्षण काढावे लागेल, त्यामुळे या प्रक्रियेसाठी पुन्हा वेळ लागू शकतो. त्यामुळे या आठ ग्रामपंचायतींच्या भुमिकेवर जिल्हा परिषद निवडणुकांचे भविष्य अवलंबून आहे.

कुणाच्या जागा वाढणार

पाच वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक २० जागा मिळविल्या होत्या. तर काँग्रेस १६ आणि भाजपला १७ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येऊन जिल्हा परिषदेत सहज सत्ता स्थापन करू शकले असते; पण गल्ली बंगाल्याच्या वादात सर्वाधिक जागा मिळूनही राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. तर काँग्रेसने भाजपसह हातमिळवणी करीत जिल्हा परिषदेत अभद्र युती केली होती; पण या निवडणुकीत थोडे वेगेळे चित्र आहे. तर सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे कुणाच्या जागा वाढणार, हे सुद्धा महत्त्वपूृर्ण ठरणार आहे.

एकाला चलो रे वरच भर

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीची सत्ता आहे; मात्र हेच चित्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कायम राहण्याची शक्यता कमी आहे. सर्वच पक्षांनी या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तर एकला चलो रेचा नारा देत तयारी सुरू केली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूकZP Electionजिल्हा परिषद