शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

सरकारच्या फसव्या घोषणांवर विश्वास ठेवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 22:51 IST

राज्य सरकारने आदिवासींच्या विकासात अडसर निर्माण करुन डी.बी.टी. सारख्या योजना लादून आदिवासी तरुण-तरुणींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम करीत आहेत. त्यांना वाम मार्गाकडे वळणारे हे फसवे धोरण आहे.

ठळक मुद्देसहषराम कोरोटे : भजेपार येथे भगवान बिरसामुंडा पुतळ््याचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : राज्य सरकारने आदिवासींच्या विकासात अडसर निर्माण करुन डी.बी.टी. सारख्या योजना लादून आदिवासी तरुण-तरुणींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम करीत आहेत. त्यांना वाम मार्गाकडे वळणारे हे फसवे धोरण आहे. वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेणारी सरकारची ही कार्यप्रणाली आदिवासींच्या जिवनाशी खेळण्याचे काम करीत आहे. सर्वसामान्य जनतेने सरकारच्या फसव्या घोषणांवर विश्वास ठेवू नये असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केले.तालुक्यातील ग्राम भजेपार येथील क्रांतीसूर्य भगवान बिरसामुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शुक्रवारी (दि.२५) ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्राम चोपा येथील रविंद्र विद्यालयाचे प्राचार्य एस.बी. राऊत होते. दिप प्रज्वलन जि.प. सदस्य सुनित मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी झेड.जे. भोयर, भिवराम विद्यालयाचे प्राचार्य अशोक पटले, आदर्श शिक्षक जी.एन. बिसेन, आर.के. किरसान, व्ही.आर. खोब्रागडे, यू.एल. टेंभरे, आर.सी. कटरे, मूर्तिकार राधेशाम नागपुरे, आदिवासी नॅशनल पिपल्स फेडरेशन समितीचे अध्यक्ष वसंत मडावी, माजी उपसभापती धानसिंग बघेले, डॉ. तारेंद्र बिसेन उपस्थित होते.पुढे बोलताना कोरोटे यांनी, आदिवासी समाजाने अंधश्रद्धा कमी करुन शिक्षणाकडे वळले पाहिजे, जेणे करुन समाजाचा विकास होईल. शिक्षण घेवून फक्त नोकरी करणे म्हणजे समाजाचा विकास नव्हे. एक नोकरदार फक्त बायका पोरांना शिक्षण देवू शकतो. पण एक उद्योजक अनेक लोकांना रोजगार देवून खºया दृष्टीने समाज विकास साधू शकतो. म्हणून सदर जबाबदारी स्वत:वर घ्या आणि उद्योगाकडे वळा असा सल्ला नवतरुणांना दिला. प्राचार्य पटले यांनी, समाजातील सांस्कृतिक वारसा कशाप्रकारे जतन करुन ठेवावा याबद्दल मार्गदर्शन केले. तर मूर्तिकार राधेशाम नागपुरे व इतर वक्तयांनी सुद्धा मार्गदर्शन केले.कार्यक्रमानिमित्त सकाळी सद्भावना रॅली काढण्यात आली व त्यानंतर रात्री समाज प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी महाराज यांच्या किर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. संचालन रामकुमार कोसने यांनी केले. आभार किसन मडावी यांनी मानले. कार्यक्रमासाठी भाकचंद मानकर, अरुण देवगडे, लक्ष्मण घरत, धनराज किरसान, प्रभूपाल गधवार, शालीकराम कुंभरे, ललीता पंधरे, भाकचंद कोडवते, देवचंद टेकाम, आनंदराव कोळवते, दिलीप कोळवते, प्रेमलाल धुर्वे, उषा टेकाम, धुरपता किरसान यांच्यासह भजेपार परिसरातील सर्व आदिवासीबांधवांनी सहकार्य केले.