शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
2
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
3
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
4
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
5
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
6
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
7
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
8
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
9
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
10
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
11
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
12
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
14
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
15
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
16
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
17
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
18
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
20
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले

लाखोंची योजना पाणी देईना

By admin | Published: October 09, 2015 2:13 AM

अर्जुनी गावात पाणी पुरवठा योजनेंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प. गोंदियाच्या वतीने ६५ हजार लिटर क्षमतेचे सन २०१३-१४ मध्ये लाखो रूपये खर्चून जलकुंभ तयार करण्यात आले.

ग्रामपंचायतचे दुर्लक्ष : नळ लागले पण पाणी येत नाही, टाकीवर लाखोंचा खर्चविजेंद्र मेश्राम  खातियाअर्जुनी गावात पाणी पुरवठा योजनेंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प. गोंदियाच्या वतीने ६५ हजार लिटर क्षमतेचे सन २०१३-१४ मध्ये लाखो रूपये खर्चून जलकुंभ तयार करण्यात आले. गावात घरोघरी नळांची जोडणीसुद्धा करण्यात आली. मात्र या नळांद्वारे पिण्याचे शुद्ध पाणीच मिळत नसल्याने पिण्याच्या पाण्याची मोठीच समस्या उद्भवली आहे. यात पाईप लाईनची फिटिंगच चुकीची करण्यात आल्याने अनेकांच्या घरी नळांना पाणीच येत नाही. गावात एकूण ३५४ नळ जोडण्या आहेत. आजही अनेक लोक नळ कनेक्शन घेत आहेत. मात्र पाणीच मिळत नसल्याने गावकरी त्रस्त होवून गेले आहेत. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी यासाठी शासनाच्या वतीने लाखो रूपये खर्च करून जलकुंभ तयार करण्यात येत आहेत. परंतु पाणी पुरवठा योजनेच्या क्रियान्वयनाबाबत प्रशासन सजग नसल्यामुळे पाणी टंचाई भासत आहे. याचा परिणाम ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे.सदर समस्येबाबत गावकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला सांगितले आहे. परंतु या समस्येचे निवारण अद्यापही करण्यात न आल्याने ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. अर्जुनी गावातील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र गजभिये यांनी सांगितले की, सन २०१३-१४ मध्ये सदर जलकुंभ तयार करण्यात आला. त्याची क्षमता ६५ हजार लिटरची आहे. या जलकुंभामधून नळ जोडण्या लावण्यात आल्या. मात्र अनेक महिन्यांपासून नागरिकांच्या घरी नळापर्यंत पाणी पोहोचतच नाही. तसेच अनेक ठिकाणातून पाईप लाईन फुटून पाणी बेवारस पाणी जात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. या प्रकाराबाबत गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे. जर ग्रामपंचायत प्रशासन याकडे लक्ष देणार नाही, तर कोण देईल? असा प्रश्न गावकरी विचारत आहेत. सदर समस्या त्वरित सोडवून नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचविण्यात यावे, अशी मागणी अर्जुनीवासीयांनी केली आहे.