शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
3
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
4
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
5
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
6
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
7
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! PCB ने दुसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलले; कारण जुनेच सांगितले
8
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
9
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
10
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
11
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
12
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
13
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात
14
IND vs BAN : रिषभमुळे रोहितने निर्णय बदलला; सिराजची मागणी फेटाळली; पंतने अखेर माफी मागितली
15
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
16
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
17
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
18
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
19
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
20
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 

रब्बी पिकांमुळे विहिरी पडू लागल्या कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2017 1:11 AM

गावालगत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतात बोअर करुन पाण्याचा स्त्रोत निर्माण केला.

पाण्याची पातळी ७० टक्के पर्यंत खाली : उन्हाळ्यात भासणार पाणी टंचाई केशोरी : गावालगत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतात बोअर करुन पाण्याचा स्त्रोत निर्माण केला. उन्हाळी धानाची मोठ्या प्रमाणात लागवड केल्याने गावातील विहिरीतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊन कोरड्या पडण्याच्या मार्गावर आली आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या उग्र रुप धारण करु पाहत आहे. याकडे कृषी विभागाने लक्ष देऊन धान पिकासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याचा वापर करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धानाचे रबी पिकाची लागवड केली आहे. गावालगत जमीनी असणाऱ्या शेतकऱ्यांनी बोअर मारुन २४ तास विद्युत मोटार चालू राहील. या अपेक्षेने पाण्याचा स्त्रोत निर्माण करुन पाण्याचा उपसा करण्याचा सपाटा सुरु केला आहे. पावसाळी धान पिकापेक्षा रबी धान पिकाचे उत्पन्न जास्त होत आहे. या भागातील शेतकऱ्यांचा कल उन्हाळी धानपिकाकडे जास्त आहे. गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मार्च, एप्रिल, मे, जून या चार महिन्यापर्यंत गावातील विहिरीचे पाणी मिळणे आवश्यक असते. उन्हाळा चालू होण्यापूर्वीच विहिरीतील पाणी पातळी ७० टक्के पर्यंत कमी झाली आहे. सध्या फेबु्रवारी महिना सुरु आहे. उन्हाळ्यात विहिरींची काय अवस्था होईल, याची नागरिकांना चिंता वाटायला लागली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. याप्रकरणी कृषी विभागाने विशेष लक्ष घालून रबी पिकासाठी लागणारा आवश्यकतेपेक्षा अधिक पाण्याचा उपसा न करता पाण्याचा योग्य वापर करुन रबी धानपीक काढण्याचा शिबिराचे आयोजन करुन सल्ला द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.(वार्ताहर)