शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

हक्काच्या निवाऱ्यासाठी 'त्या' कुटुंबीयांचा संघर्ष कायम, शासन-प्रशासन दखल घेईना !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 2:29 PM

भर पावसाळ्यात उघड्यावर राहण्याची वेळ

विजेंद्र मेश्राम

खातिया (गोंदिया) :गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील विमानतळामुळे अतिक्रमण हटविण्यात आलेल्या नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही मार्गी लागला नसल्याने या कुटुंबीयांना भर पावसाळ्यात उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. हक्काच्या निवाऱ्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा ना शासन, ना प्रशासन दखल घेत असल्याने प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष कायम आहे.

गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळासाठी विमानतळ प्राधिकरणाने येथील अतिक्रमण २०२१ मध्ये काढले होते. यामुळे या परिसरात मागील २० ते २५ वर्षांपासून पक्के घर बांधून राहणाऱ्या कुटुंबांचे पक्के घरे पाडण्यात आल्याने त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कुटुंबांना घरे बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून न दिल्याने त्यांनी बिरसी येथील ग्रामपंचायतच्या मोकळ्या जागेवर झोपड्या बांधून वास्तव्य करण्यास सुरुवात केली. बेघर झालेल्या कुटुंबीयांनी घरे बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, या मागणीचे लोकप्रतिनिधी व प्रशासनाला अनेकदा निवेदन दिले. पण त्यांची अद्यापही कुणीही दखल घेतली नाही. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून या कुटुंबांचा निवाऱ्यासाठी संघर्ष कायम आहे. परिणामी या कुटुंबांना तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या झोपड्यांमध्ये ऊन, वारा व पावसाचा मारा सहन करीत दिवस काढावे लागत आहे. पण लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला या कुटुंबीयांच्या समस्येची जाणीव झाली नाही.

आमचा वाली कोणीच नाही

विमानतळ प्राधिकरणाने आमचे अतिक्रमण हटविल्यानंतर घरे बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी म्हणून खा. सुनील मेंढे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींना अनेकदा त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. तर जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा केला. पण कुणीच याची दखल घेतली नाही. त्यामुळे गोरगरीब कुटुंबीयांचा कुणीच वाली नसल्याची भावना या कुटुंबीयांनी व्यक्त केली.

ग्रामपंचायतने केला पाठपुरावा

बिरसी येथील ग्रामपंचायतच्यावतीने अनेकदा या अतिक्रमणबाधित कुटुंबीयांना घरे बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, म्हणून शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. पण याची कुणीच दखल घेतली नाही. त्यामुळे या कुटुंबीयांचा प्रश्न कायम आहे.

- उमेशसिंह रामप्रसादसिंह पंडेले, उपसरपंच ग्रामपंचायत बिरसी

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतgondiya-acगोंदिया