शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
3
शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
4
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
5
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?
7
पुण्याच्या मैदानात Mitchell Santner ची हवा; पहिल्या डावात टीम इंडियानं केल्या फक्त १५६ धावा
8
Reliance Bonus Share : Reliance Industries देतेय एकावर एक शेअर फ्री; गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा
9
“आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंनी स्वतः उभे राहावे किंवा जय शाहांनाच आणावे”: संजय राऊत
10
जळगावमध्ये गेल्या विधानसभेत विरोधात, आता सोबत करताहेत प्रचार
11
Girish Mahajan : "सर्व बंडखोरांची समजूत घालू, जिल्ह्यात एकाही ठिकाणी बंडखोरी होणार नाही"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
13
अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर
14
बापरे! बँकेच्या लॉकरमधून ४० लाखांचे दागिने गायब; फोन येताच महिलेला बसला मोठा धक्का
15
पोलीस कर्मचारी क्रिकेट खेळण्यात व्यस्त, इकडे चौकीतून हातकड्यांसह चोरट्याने काढला पळ
16
"...'तेव्हा' यांनी किती खोके दिले होते, हे मला माहीत आहे"; अमित ठाकरेंचा उद्धव-आदित्यचं नाव न घेता टोला!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
18
जास्वंदीत घाला 'हे' घरगुती खत; येत्या संकष्टीपर्यंत बाप्पासाठी मिळतील परडीभर फुलं!
19
EPFO मध्ये मोठ्या बदलांची तयारी, अधिक बचतीचा मार्ग होणार मोकळा, सरकारचा हेतू काय?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा

शिक्षण विभागाने तूर्तास शाळा सुरू करु नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 5:00 AM

प्रारुप आराखडा तयार करण्याच्या दृष्टीकोनातून गेल्या पंधरवाड्यामध्ये राज्याच्या शिक्षण संचालकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना देऊन इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यासबंधीचा निर्णय घेवून सदर शिक्षण पद्धती ऑनलाईन की ऑफलाईन देणे हे तेथील स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येतील असे सूचविले आहे.

ठळक मुद्देशालेय व्यवस्थापन समिती : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : शैक्षणिक सत्र २०२०-२१ मधील शाळा सुरु करण्यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी (माध्य.) सर्व मुख्याध्यापकांना पत्र देवून २६ जूनपासून शाळा सुरु करण्यासंबधी सूचना देऊन शाळा कशा पद्धतीने सुरु करण्यात येतील याबाबत कळविले. तत्पूर्वी मुख्याध्यापकांनी आपल्या स्तरावर शाळा व्यवस्थापन व शिक्षक समितीच्या सभांचे आयोजन करुन शाळेतील सर्व भौतिक सोई सुविधा व विद्यार्थ्याची सुरक्षितता याचा परिपूर्ण विचार करुन स्वतंत्र नियोजनासह अहवाल मागीतला. त्या दृष्टीने मुख्याध्यापकांनी बोलाविलेल्या सभेत तूर्तास शाळा सुरू करण्यात येऊ नये असा निर्णय घेण्यात आला.देशावर कोरोनाच्या महामारीचे संकट घोंगावत असताना शैक्षणिक सत्र २०२०-२१ मध्ये २६ जूनपासून शाळा सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या शिक्षण विभागाच्या हालचाली सुरू आहेत.प्रारुप आराखडा तयार करण्याच्या दृष्टीकोनातून गेल्या पंधरवाड्यामध्ये राज्याच्या शिक्षण संचालकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना देऊन इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यासबंधीचा निर्णय घेवून सदर शिक्षण पद्धती ऑनलाईन की ऑफलाईन देणे हे तेथील स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येतील असे सूचविले आहे.त्या अनुषंगाने शिक्षणाधिकाऱ्यांनी (माध्यमिक) यांनी ५ जून रोजी जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापकांना पत्र पाठवून शाळेतील भौतिक सोई सुविधा व विद्यार्थ्यांची सुरक्षितता याचा परिपूर्ण विचार शाळा व्यवस्थापन व शिक्षण समितीच्या सभेत करुन आपल्या शाळेचे स्वतंत्र नियोजन तथा अहवाल मुख्याध्यापकांना मागीतला आहे.सदर पत्रावर त्वरीत कार्यवाही म्हणून मुख्याध्यापकांनी सभांचे आयोजन करुन शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्रात नमूद केलेल्या अटी व शर्तीचे वाचन व तसा अहवाल तथा प्रारुप देण्यात आला.त्यामध्ये प्रामुख्याने शासनाने शाळा सुरु करण्यापूर्वी कोरोना विषाणूवर प्रतिबंधात्मक लस किंवा खात्रीशीर औषधीचे विद्यार्थ्यांना वाटप करुनच शाळा सुरु करण्याचा निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांच्या आरोग्यापेक्षा शिक्षण महत्त्वाचे नाही आणि त्याचबरोबर शिक्षण पद्धती ऑफलाईन असावी, मोबाईल व्यवस्था ग्रामीण भागात उपलब्ध नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी माघारल्या शिवाय राहणार नाही, असे मत पालकांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी