शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
4
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
5
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
6
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
7
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
8
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
9
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
10
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
11
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
12
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
13
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
14
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
15
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
16
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
17
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
18
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
19
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
20
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

फराळाच्या मेनूवर डाळींचा प्रभाव

By admin | Published: October 26, 2015 1:50 AM

‘दाल-रोटी खाओ, प्रभु के गुन गाओ’ जुन्या चित्रपटातील हे गाने गरीबांच्या जीवनाचे वास्तव्य दर्शवीत होते.

डाळ झाली आवाक्याबाहेर : मागील तीन महिन्यांत आली तेजी कपिल केकत गोंदिया‘दाल-रोटी खाओ, प्रभु के गुन गाओ’ जुन्या चित्रपटातील हे गाने गरीबांच्या जीवनाचे वास्तव्य दर्शवीत होते. आज मात्र गरीबच काय तर चांगल्या धनाढ्यांनाही डाळींनी घाम फोडला आहे. यामुळेच दाल-रोटीतील ‘दाल’ आता ताटातून हद्दपार झाली आहे. २० हजाराचा दर ओलांडणारी डाळ आज थोडीफार उतरून १६ हजार ५०० रूपयांवर आली असली तरी तिची खरेदी करणारा ग्राहक उरलेला नाही. अन्य धान्य साधारण असले तरी डाळींनी सर्वसामान्यांचे बजेट बिघडवून टाकले आहे. यामुळेच दिवाळीतील फराळाच्या मेनुतून डाळींचे पदार्थ यंदा आऊट होणार यात शंका नाही. झपाट्याने बदलत चाललेल्या या जगात सर्वांची धडपड सुरू आहे चांगले खाने व चांगले राहणे यासाठी. मात्र आजची स्थिती बघता वाढत्या महागाईने भल्याभल्यांचे कंबरडे मोडले असून चैनीच्या वस्तू आवाक्यात असल्या तरी दोन वेळचे जेवण मात्र हाताबाहेर जाऊ लागले आहे. पूर्वी कांदा-पोळी किंवा वरण-पोळी खाऊन जीवन जगू असे म्हटले जात होते. मात्र मध्यंतरी कांद्याने रडवून सोडले. त्यामुळे कांदा-पोळीची जोडी तुटली. त्यानंतर वरण-पोळीची जोडी जमली असतानाच आता डाळींचे दर चढल्याने वरण-पोळीचीही जोडी तुटली आहे. त्यात भाज्यांचे दरसुद्धा चढलेले असल्याने पोळीसोबत खायचे तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे उभा ठाकला आहे. मागील तीन महिन्यांत डाळींचे हे दर अचानक वाढले असून यामुळे फक्त २५ टक्क्यांवर डाळींचा व्यापार आला आहे. परिणामी पूर्वी बोलाविण्यात येत असलेल्या माला पेक्षा कितीतरी कमी प्रमाणात आम्ही डाळी बोलावित असल्याचे येथील धान्यांचे थोक व्यापारी महालक्ष्मी अनाज भंडारचे संचालक रितेश अग्रवाल सांगतात. नवीन पीक आल्यावर डाळींचे दर काही प्रमाणात पडण्याची शक्यताही त्यांनी वर्तवीत यंदाच्या दिवाळीवर याचा प्रभाव पडणार असल्याचेही अग्रवाल म्हणाले.