शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
कधीकाळी जिगरी दोस्त होते इराण-इस्रायल; जानी दुश्मन कसे बनले? सद्दामच्या इराकवर केलेला हल्ला
3
१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
4
ख्रिस गेलचा PM मोदींना 'नमस्कार'! भारतीयांना ती शैली भावली; 'युनिव्हर्सल बॉस'ची लक्षवेधी पोस्ट 
5
Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!
6
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
7
अजित पवारांनी तटकरे, पटेलांसह घेतली अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
8
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
9
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स
10
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
11
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
12
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
13
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
14
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
15
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
16
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
17
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
18
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
19
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
20
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

शाळा बंद, तरी ७५ हजार विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:20 AM

कपिल केकत गोंदिया : एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनाची धडपड सुरू असून यातूनच सक्तीने शिक्षणाचा अधिकार ...

कपिल केकत

गोंदिया : एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनाची धडपड सुरू असून यातूनच सक्तीने शिक्षणाचा अधिकार उदयास आला आहे. त्यानुसार, जिल्ह्यात प्रत्येकापर्यंत शिक्षण पोहोविण्यासाठी शिक्षण विभाग कार्यरत आहे. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना पुस्तके व गणवेशही उपलब्ध करवून दिला जात आहे. आता नवीन शिक्षण सत्र सुरू होणार असून यासाठी शिक्षण सर्व शिक्षा विभागाने ७५४१६ विद्यार्थ्यांसाठी गणवेशाचे नियोजन केले आहे. यासाठी सुमारे सात कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

‘शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही’ या म्हणीची प्रचिती कित्येकांच्या जीवनात आली असून त्यामुळेच शासन या म्हणीला आपले ब्रीद माणून कार्य करीत आहे. शासनाने प्रत्येक वर्गातील मुलांना शिक्षण मिळावे, शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अंमलात आणला आहे. त्यानुसार, शिक्षण विभागाकडून एकही मूल सुटू नये यासाठी प्रयत्न केले जातात. मुले शाळेपर्यंत पोहोचली की त्यांच्यात शाळेप्रती आवड निर्माण व्हावी, म्हणून शासनाकडून त्यांना नवीन पुस्तके, गणवेश, शालेय साहित्य व पोषण आहार यासारख्या सुविधा पुरविल्या जात आहेत. आता सन २०२० पासून प्रत्यक्ष शाळा भरल्या नसल्या तरीही शासनाकडून प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सुविधा घरपोच दिल्या जात आहेत. त्यात नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत असल्याने शिक्षण विभाग पुन्हा कामाला लागला आहे. शासनाकडून सर्व मुली, अनु. जमाती (एसटी) मुले, अनु. जाती (एससी) मुले व दारिद्र्य रेषेखालील मुलांनाच गणवेश दिले जात असून यंदा शिक्षण विभागाने गणवेशासाठी ७५४१६ विद्यार्थ्यांची नोंद केली असून तसा प्रस्ताव सादर केला आहे. यासाठी सुमारे सात कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना गणवेशासाठी आरक्षणाची अट असल्याने त्यानुसारच गणवेशाची पूर्तता केली जाते.

-----------------------------

विद्यार्थ्यांना गणवेश वाटपात दुजाभाव नकोच

जिल्ह्यात इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंत यंदा ९५ हजार ७८८ विद्यार्थ्यांसाठी सर्व शिक्षा अभियानाकडून पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांला शासनाकडून पुस्तके दिली जातात. गणवेश वाटप करताना त्यात कसल्याही प्रकारचा दुजाभाव नको.

--------------------------

अशी आहे गणवेशासाठी वर्गवारी...

सर्व शिक्षा अभियानांतर्गत ७५४१६ विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या गणवेशाच्या नियोजनात ३७७५० मुली, ७१४० अनु. जमाती मुले, ४०४५ अनु. जाती मुले, तर २६४८१ दारिद्र्‌य रेषेखालील मुलांचा समावेश आहे. यानुसार, जिल्ह्यात गणवेश वाटपासाठी सर्व शिक्षा अभियानाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र उरलेल्या विद्यार्थ्यांना गणवेशापासून मुकावे लागणार आहे.