शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

प्रत्येक गावाला मिळेल शुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2017 12:15 AM

पिण्याचे शुद्ध पाणी हे प्रत्येक नागरिकाचे हक्क आहे. अनेक वर्षांपर्यंत ग्रामीण भागातील महिला विहिरीतून पाणी भरत होत्या.

गोपालदास अग्रवाल : रायपूर येथे ४० लाखांच्या योजनेचे भूमिपूजन लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : पिण्याचे शुद्ध पाणी हे प्रत्येक नागरिकाचे हक्क आहे. अनेक वर्षांपर्यंत ग्रामीण भागातील महिला विहिरीतून पाणी भरत होत्या. त्यानंतर हळूहळू बोअरवेलचा काळ आला. परंतु महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी मेहनत करावी लागत होती. त्यासाठी आम्ही प्रत्येक गावात पाणी पुरवठा योजना आणण्याचे उद्दिष्ट ठेवले. आज गोंदिया तालुक्यातील सर्वच गावांमध्ये पाणी पुरवठा योजनेचे मूळ स्वरूप तयार करण्यात आम्ही यशस्वी ठरलो, असे प्रतिपादन आ. गोपालदास अग्रवाल यांनी केले. रायपूर येथे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत ४० लाख रूपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेचे विस्तारीकरण व नविनीकरण बांधकामाचे भूमिपूजन आ. अग्रवाल यांच्या हस्ते, पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. आ. अग्रवाल पुढे म्हणाले, कुडवा-कटंगी गावांसाठी विशेष जलशुद्धीकरण केंद्राची स्थापना करून दोन्ही गावांमध्ये पाणी पुरवठा योजना तयार करून दिली. भविष्यात प्रत्येक गावात जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातूनच पाणी पुरवठा करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे यांनी, आ. अग्रवाल यांच्या नेतृत्वात गोंदिया पंचायत समिती प्रत्येक गावातील नागरिकापर्यंत व्ययक्तिक लाभाच्या योजना पोहोचविण्याचे कार्य करीत आहे. प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाला शौचालयासह घरकुलाचा लाभ देवून गोंदिया तालुका निर्मल तालुका बनविण्यासाठी कार्य करीत असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रामुख्याने जि.प. सभापती पी.जी. कटरे, विमल नागपुरे, पं.स. उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, लुरेंद्र रहांगडाले, केवलचंद रहांगडाले, भोजराज चुलपार, पं.स. सदस्य प्रमिला करचाल, सरपंच कल्पना रहांगडाले, उपसरपंच डॉ. योगेश बिसेन, लक्ष्मी रहांगडाले, रूद्रसेन खांडेकर, जगतराय बिसेन, राखी कटरे, भुपेश रहांगडाले, रिना आंबाडारे, सविता बोरकर, चुन्नीलाल रहांगडाले, संजय घरडे, लोकचंद बिजेवार, जायत्रा पाचे, हरिचंद बिसेन, रूखदास दंदरे, हिरलाल पाचे, कुंवरलाल येडे, छगनलाल बिसेन, मोहन बिसेन, रामलाल रहांगडाले, सेवक भंडारी आदी उपस्थित होते.