शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

हळद लागवडकडे वळतोय शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:27 AM

बाराभाटी : धान पिकाला फाटा देत, जिल्ह्यात नवनवीन पिकांकडे शेतकऱ्यांना वळविण्याचे कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. यातच आता शेतकरीही ...

बाराभाटी : धान पिकाला फाटा देत, जिल्ह्यात नवनवीन पिकांकडे शेतकऱ्यांना वळविण्याचे कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. यातच आता शेतकरीही आपल्या शेतात प्रायोगिक तत्त्वावर नवनवे प्रयोग करताना दिसत आहे. येथील शेतकरी किशोर तरोणे यांनीही आपल्या शेतात हळद लागवडीचा प्रयोग केला असून, त्यांनी यंदा १० क्विंटल पीक घेतले आहे.

नवेगावबांध येथील शेतकरी किशोर तरोणे यांनी आपल्या अर्ध्या एकर शेतात नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून हळदीची लागवड केली होती. आता हळदीचे पीक निघाले आहे, त्यावर प्रक्रिया करावी लागते, परंतु नवेगावबांध परिसरात हळदीचे पीक खूप कमी प्रमाणात घेतले जात असल्यामुळे, नवीन तंत्रज्ञानाने हळदीवर प्रक्रिया करण्यासाठी अवजारे उपलब्ध नाहीत, तसेच ते खरेदी करणे ही शक्य नाही. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने हळदीवर प्रक्रिया करणे सुरू आहे. यामध्ये हळदीला पाण्यामध्ये उकळून शिजविले जाते व वाळविल्यानंतर तिला भरडण्यात येते. त्यामुळे आपल्याला खाण्यायोग्य हळद निर्माण होत असून, ही प्रक्रिया पारंपरिक पद्धतीने केल्यास मजुरीवरील खर्च १० पटीने वाढतो, परंतु पर्याय उपलब्ध नसल्यामुळे या वर्षी शेतात झालेली १० क्विंटल हळद ही पारंपरिक पद्धतीने प्रक्रिया करण्यात आली.