शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

धानाला हमीभाव, मग मोहफुलाला का नाही? शेतकऱ्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2022 11:06 AM

धानाप्रमाणेच मोहफुलांची हमीभावाने शासकीय खरेदी केल्यास आदिवासीबहुल भागातील शेतकऱ्यांना त्याची मदत होऊ शकते.

ठळक मुद्देहमीभाव जाहीर केल्यास होणार मदत चारशे कोटी रुपयांची उलाढाल

अंकुश गुंडावार

गोंदिया : पूर्व विदर्भात धानाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. शासनाकडून हमीभावाने धानाची खरेदीसुध्दा केली जात असल्याने शेतकऱ्यांना त्याची मदत होते, तर याच भागात उन्हाळ्याच्या दिवसात एक ते सव्वा लाख मेट्रिक टन मोहफुलाचे संकलन केले जाते. यातून जवळपास चारशे कोटी रुपयांची उलाढाल होत असून, ग्रामीण भागात रोजगारदेखील मिळतो. त्यामुळे धानाप्रमाणेच मोहफुलांची हमीभावाने शासकीय खरेदी केल्यास आदिवासीबहुल भागातील शेतकऱ्यांना त्याची मदत होऊ शकते.

अनेक प्रकारचे पोषक घटक असलेल्या मोहफुलांपासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनविले जातात. पण, मोहफुलांचा जास्तीत जास्त वापर हातभट्टीची गावठी दारू बनविण्यासाठीच केला जातो. या गावठी दारूचे आकर्षण विदेशी दारू पिणाऱ्यांनाही असते. असे असताना आतापर्यंत मोहफुलांपासून देशी दारूसुद्धा बनविण्याची परवानगी नव्हती.

राज्य मंत्रिमंडळाने मोहफुलांपासून थेट विदेशी दारू बनविण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मोहफुले गोळा करणाऱ्यांना मोठा आधार मिळाला. धान उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून लूट होऊ नये व त्यांना हमीभाव मिळावा, यासाठी शासनाकडून हमीभावाने धानाची खरेदी केली जाते. तशीच मोहफुलांची खरेदी केल्यास गोरगरिबांची आणि शेतकऱ्यांची दिशाभूल होणार नाही. त्यामुळेच मोहफुलाची हमीभावाने खरेदी करण्याची मागणी केली जात आहे.

प्रस्तावाकडे शासनाचे दुुर्लक्ष

गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर अमरावती या जिल्ह्यांसह धुळे आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मोहफुलाचे उत्पादन घेतले जाते. तसेच या जिल्ह्यांमध्ये शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी केली जाते. याच केंद्रावर मोहफुलांची खरेदी केली जावी, यासंबंधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला; पण अद्यापही यावर कुठलाच निर्णय घेण्यात आला नाही.

मोहफूल काढणीचा हंगाम सुरू

सध्या मोहफूल काढणीचा हंगाम सुरू आहे. मोहफूल गोळा करून उन्हात वाळवल्यानंतर त्याची विक्री केली जाते. यामुळे आदिवासीबहुल आणि वनपरिक्षेत्रालगत असलेल्या गावकऱ्यांना रोजगाराची संधी प्राप्त होते. मात्र व्यापारी कमी दराने मोहाफुलाची खरेदी करीत असल्याने शेतकरी आणि गोरगरीब नागरिकांची लूट होत आहे.

दोन महिन्यांत होते चारशे कोटींची उलाढाल

मोहफुले संकलित करण्याचा हंगाम हा जवळपास दोन महिन्यांचा असतो. पूर्व विदर्भात जवळपास एक ते सव्वा लाख टन मोहफुलाचे संकलन होते. यातूच जवळपास चारशे कोटी रुपयांची उलाढाल होते.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीGovernmentसरकारVidarbhaविदर्भ