शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
2
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
3
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
4
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
5
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
6
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
7
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
8
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
9
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
10
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
11
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
12
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
13
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
14
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
15
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
16
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
17
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
18
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
19
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
20
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...

शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 4:20 AM

बोंडगावदेवी : वाढती महागाई पाहता शेती करताना विविध आव्हानांना तोंड द्यावे लागते. भातशेती करताना वारेमाप खर्चाला आळा बसण्यासाठी शेतकरी ...

बोंडगावदेवी : वाढती महागाई पाहता शेती करताना विविध आव्हानांना तोंड द्यावे लागते. भातशेती करताना वारेमाप खर्चाला आळा बसण्यासाठी शेतकरी बांधवांनी कमीत कमी खर्चाचे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे. उत्पादनाचा वाढता खर्च कमी करून पिकाचे उत्पादन घेण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाची कास धरावी, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार यांनी केले.

कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कृषी मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात शेतकरी मार्गदर्शन शिबिराच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रतिमा बोरकर होत्या. याप्रसंगी कृषीविषयक मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार, मंडळ कृषी अधिकारी वरखडे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे, कृषी पर्यवेक्षक कठाणे उपस्थित होते. या वेळी उपसरपंच भाग्यवान फुल्लुके, ग्रामविस्तार अधिकारी पी.एम. समरीत, तालुकास्तरीय कृषी समिती सदस्य रवी बनपूरकर, अमरचंद ठवरे, कृषी साहाय्यक खोटेले उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना रवींद्र लांजेवार म्हणाले, खरीप हंगामाला सुरुवात झाली. समस्त शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांची माहिती व्हावी. पीक उत्पादनवाढ आधुनिक तंत्रज्ञानाची इत्थंभूत माहिती शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवावी हा हेतू ठेवून कृषी संजीवनी मोहीम १ जुलैपर्यंत सर्वत्र राबविण्यात येत आहे. आजची पारंपरिक शेती आवाक्याबाहेर गेली आहे. कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भात पिकाची नर्सरी लावणे गरजेचे असल्याचे सांगून कमी खर्चाच्या सुधारित तंत्रज्ञानाची चारसूत्री, सगुना पट्टा, श्री पद्धतीने भात पिकाची लागवड फायदेशीर असल्याचे सांगितले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे यांनी संत सावता माळी रयत बाजाराविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक करून उपस्थितांचे आभार कृषी सहायक खोटेले यांनी केले. कार्यक्रमाला गावातील शेतकरी, बचतगटाच्या महिला शेतकरी उपस्थित होते.

..................