शहरं
Join us  
Trending Stories
1
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
2
"माझ्या करिअरचं फार वाटोळ केलं", पंकजा मुंडेंनी हात जोडून हसतच दिलं उत्तर
3
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
4
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
5
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
6
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
7
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?
8
Ashish Shelar : "मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
“जरांगेंच्या प्रकृतीची काळजी, आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांवर आरक्षण देऊ”: संजय राऊत
10
"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
11
टाटांनी 'या' कंपनीतून कमावला २३,०००% नफा; आता कमी केला हिस्सा, कोणती आहे कंपनी?
12
गजबच झालं! ठगांनी थेट खोटी बँकच सुरू केली, लाखो रुपये घेऊन लोकांना नोकरीही दिली, मग...
13
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
14
VINTAGE भज्जी! हरभजनने लगावला अफलातून सिक्सर; जाग्या झाल्या जुन्या आठवणी
15
टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान
16
"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."
17
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
18
“राज्यात बहि‍णींना सुरक्षेची गरज, वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार”: नाना पटोले
19
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
20
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!

अखेर जुनी पेन्शनचा मुद्दा राजकीय पटलावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:11 AM

मागील १५ वर्षापासून लुप्त असलेला कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शनचा मुद्दा अखेर राजकीय पक्षांच्या पटलावर चिन्हीत झाला असून सध्या होऊ घातलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी जुनी पेंशनचा मुद्दा त्यांच्या जाहीरनाम्यात समावेश केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील १५ वर्षापासून लुप्त असलेला कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शनचा मुद्दा अखेर राजकीय पक्षांच्या पटलावर चिन्हीत झाला असून सध्या होऊ घातलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी जुनी पेंशनचा मुद्दा त्यांच्या जाहीरनाम्यात समावेश केला आहे.शासकीय कर्मचाऱ्यांना संविधानाच्या कलमान्वये सुरु असलेली १९६२ व १९८४ ची पेंशन योजना २००४ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने बंद केली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २००४ पासून तर महाराष्ट्रातील कर्मचाºयांना १ नोव्हेंबर २००४ पासून तर महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबर २००५ पासून १९८२ ची जुनी पेंशन योजना नाकारुन नवीन परिभाषीत अंशदायी पेंशन योजना लागू करण्यात आली. इतर राज्यातही नवीन पेशंन योजना लादण्यात आली.याविरोधात तत्कालीन कर्मचारी संघटनांनी विरोध न दर्शविल्याने राजकीय पक्षांचे याकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र २०१५ पासून राज्यात वितेश खांडेकर व देशात विजय बंधू यांच्या नेतृत्वात अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांनी मोर्चे उभारुन नवीन पेंशन योजनेला तीव्र विरोध दर्शविला.सदर विरोध व कर्मचाऱ्यांचा तीव्र आक्रोश लक्षात घेता राजकीय पक्षांनी कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. या अनुषंगाने विविध राज्यात राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. दिल्लीतील आप सरकारने संख्याबळ दाखवून जुनी पेंशन योजना देण्याचे घोषीत केले आहे.२६ नोव्हेंबरला दिल्लीत आयोजित संसद मार्चनंतर आप सरकार कर्मचाºयांना जुनी पेंशन लागू करण्याचे संकेत दिले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी सुध्दा जुनी पेंशन विषयी सकारात्मकता दर्शविल्याने राज्य शासनाद्वारे लवकरच पेन्शन विषयक कर्मचारी हिताचे निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये आप पक्षाने कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू करण्याच्या मुद्दा त्यांचा जाहिरनाम्यात घेतला आहे.जुनी पेन्शन मुद्दा जाहीरनाम्यातसध्या सुरू असलेल्या मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्य विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने घोषित केलेल्या निवडणुक जाहीरनाम्यात २००४ नंतरच्या सर्व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्याचा समावेश केला आहे.संसद मार्च २६ नोव्हेंबरला२००४ नंतर शासकीय सेवेत रूजू असलेल्या कर्मचाऱ्यांना १९६२ व १९८४ ची जुनी पेंशन योजना लागू करा या मागणीसाठी २६ नोव्हेंबर संविधान दिनी संसद मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. यात कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, जिल्हाध्यक्ष राज कडव, सचिन राठौड,प्रवीण दसार, संदीप सोमवंशी, मुकेश रहांगडाले, महेंद्र चव्हाण, सुभाष सोनेवाने, सचिन घोपेकर, शीतल कनपटे,जयेश लिल्हारे, संतोष रहांगडाले, जीवन म्हशाखेत्री, भूषण लोहारे, सुनील चौरागडे यांनी कळविले आहे.